Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»अपघात»पुलावरून कार कोसळून चौघा जिवलग मित्रांचा मृत्यू
    अपघात

    पुलावरून कार कोसळून चौघा जिवलग मित्रांचा मृत्यू

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 2, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये भीषण अपघातामध्ये ४ जिवलग मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. १०० च्या स्पीडमध्ये असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट पुलावरून खाली कोसळली. २० फूट उंचावरून ही कार थेट पाणी भरलेल्या शेतात पडली. या अपघातामध्ये कारमध्ये असलेल्या चौघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. या अपघाताचा तपास उत्तर प्रदेश पोलिस करत आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात छपार परिसरातील रामपूरमध्ये झाला. कारमधील सर्वजण गुजरातमधील होते. हे सर्वजण उत्तराखंडमधील केदारनाथला जात होते. कार १०० च्या स्पीडमध्ये होते. त्यावेळी अचानक चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार संरक्षण भिंत तोडून पूलावरून खाली कोसळली. अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारमधील सर्वांना बाहेर बाहेर काढले आणि रुग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी उपचारापूर्वी चौघांना मृत घोषीत केले तर एकाची प्रकृती गंभीर आहे.

    अपघातामध्ये, मोहन ठाकूर, करण, अमित, विपुल यांचा मृत्यू झाला. हे सर्वजण गुजरातच्या गांधीनगरमधील तारापूरमध्ये राहणारे होते. प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, पानीपत-खटीमा नॅशनल हायवेवर कारला अपघात झाला. कारमधील सर्वजण हरियाणाच्या दिशेवरून येत होते. पूलावर वळणाचा रस्ता आहे. कारचा स्पीड जास्त होता. त्यामुळे कारचालकाचा ताबा सुटला आणि कार शेतामध्ये भरलेल्या पाण्यात कोसळली. कारमध्ये असलेल्यांनी सीट बेल्ट लावले नव्हते. जखमींना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांनी प्रयत्न केला पण दरवाजे उघडत नव्हते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    भाजप कार्यालय फोडलं : १५-२० हल्लेखोरांचा हल्ला!

    May 12, 2026

    गिरणा नदीपात्रात बैलगाडी उलटली; शेतकऱ्याचा बुडून अंत!

    May 12, 2026

    ७१७ सरकारी दारूची दुकाने तातडीने बंद करा!

    May 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif