Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»आधी ‘भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल’, आता मराठी माणूस बायकोला..
    महाराष्ट्र

    आधी ‘भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल’, आता मराठी माणूस बायकोला..

    परप्रांतीय तरुणाच्या विधानाने वाद निर्माण होण्याची शक्यता
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 25, 2026No Comments281 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील परप्रांतीय हा चर्चेचा विषय ठरत आहेत. आता एका परप्रांतीय तरुणाने पुन्हा एकदा मराठी माणसाला डिवचलं आहे. यामुळे सोशल मीडियावर नवा वाद निर्माण झाला आहे. रेल्वे कॅन्टीन प्रकरणानंतर आता पुन्हा एकदा एका परप्रांतीय तरुणाने मराठी समाजावर वादग्रस्त टिप्पणी केली आहे. या तरुणाने केलेल्या वक्तव्यामुळे मराठी माणूस पेटून उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

    सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये हा तरुण म्हणतो की, “मराठी माणूस स्वतःच्या बायकोला दुसऱ्यांच्या घरी भांडी घासायला पाठवतो, काम करायला लावतो आणि स्वतःला भाई समजतो.” त्याने पुढे असेही म्हटले की, “आमच्या बायका कधी भांडी घासताना पाहिल्यात का?” ही टिप्पणी मराठी समाजातील पुरुषांच्या प्रतिष्ठेला आणि संस्कृतीला लक्ष्य करणारी असल्याने ती अत्यंत आक्षेपार्ह ठरली आहे.

    यापूर्वीही याच तरुणाने रेल्वे कॅन्टीनमध्ये “भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल” असे वक्तव्य करून वाद निर्माण केला होता. त्या घटनेनंतरही तो शांत बसला नसून आता मराठी माणसांवर थेट टीका करत आहे. यामुळे मराठी समाजात संतापाची लाट उसळण्याची शक्यता आहे.

    मराठी माणूस स्वतःच्या कुटुंबाबद्दल आणि विशेषतः स्त्रियांबद्दल अत्यंत संवेदनशील असतो. अशा परिस्थितीत एखाद्या परप्रांतीय तरुणाने केलेले हे वक्तव्य केवळ व्यक्तिगत टीका न राहता सामाजिक आणि भाषिक भावना दुखावणारे ठरले आहे. अनेक मराठी युजर्सनी या तरुणाच्या व्हिडीओवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत तरुणाची निंदा केली आहे. काहींनी असेही म्हटले आहे की अशा प्रकारची टिप्पणी सामाजिक सलोख्याला बाधा आणणारी आहे.

    मुंबई आणि महाराष्ट्रातील भाषिक मुद्दे वेळोवेळी चर्चेत येत असताना अशी वादग्रस्त वक्तव्ये वातावरण अधिक तणावपूर्ण बनवू शकतात. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने पसरत असून त्यावरून चर्चा सुरू झाली आहे. व्हायरल व्हिडीओमधील परप्रांतीय तरुणाचे वक्तव्य मराठी माणसाला डिवचणारे आणि संताप निर्माण करणारे ठरले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप

    September 16, 2026

    बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून

    September 16, 2026

    चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल

    September 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif