Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»2029 च्या भीतीने भाजप प्रादेशिक पक्ष फोडतोय!
    राजकारण

    2029 च्या भीतीने भाजप प्रादेशिक पक्ष फोडतोय!

    850 खासदारांचा आकडा गाठून संविधान बदलण्याचा डाव?
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 19, 2026No Comments168 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    देशात सध्या खासदार फोडण्याचे वारे वाहत आहेत. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे खासदार फोडल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार फोडण्यात आले आहेत. आता काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि समाजवादी पार्टीचे खासदारही फोडले जाणार आहेत. डीलिमिटेशन आणि नारीशक्ती विधेयक मंजूर करण्यासाठी देशभरात खासदार फोडण्याचे काम सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, ही थिअरी खासदार संजय राऊत यांनी फेटाळून लावली आहे. संजय राऊत यांनी नवा गौप्यस्फोट केल्याने एकच खळबळ उडाली आहे. मीडियाशी संवाद साधताना राऊत यांनी आज मोठा बॉम्ब टाकला आहे.

    नारी शक्ती विधेयक आणि डीलिमिटेशन विधेयक मंजूर करण्यासाठी खासदारांची फोडाफोडी सुरू आहे, हे विश्लेषण चुकीचं आहे. नंबर गेमसाठी आम्ही आमच्या पक्षाचा बळी द्यायचा का? आमच्या प्रादेशिक अस्मितेचा बळी द्यायचा का? उद्या अमित शाह उद्या नसतील. ते काही संजीवनी बुटीका खाऊन जन्माला आले नाही ना. ते काय अमर आहेत का? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

    भाजपला घाबरलेली आहे. 2029 मध्ये काँग्रेससोबत त्यांना प्रादेशिक पक्ष राहू नये असं वाटतं. 850 खासदारांचा आकडा घेऊन भाजप संविधानात बदल करणार आहे. संविधान बदलल्यावर भाजपला देशातील लोकशाही खतम करायची आहे आणि त्यांना या देशात हुकूमशाही आणायची आहे. अध्यक्षीय पद्धत आणायची आहे. तानाशाही आणायची आहे. पण आम्ही ते होऊ देणार नाही, असा गौप्यस्फोटच राऊत यांनी केला आहे.

    राहुल गांधी देशाचे नेते आहेत. लोकप्रिय नेता आहेत. ते संघर्ष करत आहे. आज अशाच संघर्षाची गरज आहे. राहुल गांधींच्या लीडरशीपनेच मोदींना आव्हान उभं केलं आहे. 2029मध्ये आम्ही राहुल गांधींच्या नेतृत्वात सरकार बनवणार आहोत. हे मोदी आणि शाह यांना माहीत आहे. त्यामुळेच ते प्रादेशिक पक्ष तोडत आहे. आम्ही 2029 मध्ये केंद्रात सरकार बनवतोय हे मोदी आणि शाहांना माहीत आहे. त्यामुळेच आज देश राहुल गांधींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे, असं त्यांनी सांगितलं.

    शरद पवार गटाचे खासदारही फोडले जाणार असल्याची चर्चा आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. हेच काम आहे ना दिल्लीवाल्यांचं? मी सांगितलं ना काल मोदी आणि ट्रम्प यांची बैठक झाली. शिंदे तुमचे खासदार फोडणार आहे, सरकार सांभाळा असं मोदी ट्रम्पला सांगत आहेत, असा चिमटाही त्यांनी काढला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif