धरणगाव पाटबंधारे विभागात शेतकऱ्यांची धडक

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
धरणगाव – तालुक्यात पाटबंधारे विभाग अतर्गत मायनर एक पंधरा दिवसापासून रब्बी हंगामासाठी पाणी सुरू असून ब्रांच दोन वरील सर्व शेतकऱ्यांच्या रब्बी पेरण्या गहू ,मका ,हरबरा याची पेरणी होऊन वीस पंचवीस दिवस होऊन गेले तरीसुद्धा गिरणा कॅनल वरील ब्रांच 2 म्हणजे धरणगाव पिंपळे बाबळे निशाने या शेतकऱ्यांच्या पिके पाणी अभावी उगवन झालेली नाही, त्यासाठी ब्रँच दोन ला लवकरात लवकर पाणी सोडावे यासाठी उपकार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग धरणगावचे जाधव यांची या सर्व शेतकऱ्यांच्या भेट घेऊन व्यथा मांडल्या.
जाधव यांनी संबंधित गावाच्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आज पासून पाणी पोहोचेल एवढं पाणी मी आज सोडतो असं आश्वस्त शेतकऱ्यांना केले याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली खालील शेतकरी उपस्थित होते, शिवसेनेचे जिल्हा उपसंघटक राजेंद्र ठाकरे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख शरद माळी, शिवसेनेचे शहर प्रमुख नगरसेवक भागवत चौधरी, युवा सेनेचे लक्षण माळी, तसेच पिंपळे गावातील शेतकरी जगदीश पाटील माजी सरपंच, संदीप पाटील, श्रीकृष्ण पाटील ,विनायक पाटील, गुड्डू पाटील ,भगवान पाटील, संतोष पाटील, प्रशांत पाटील ,मुकेश पाटील ,आनंदा पाटील, रवींद्र पाटील, गणेश पाटील या सर्व शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.