Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • महामार्ग बायपासचा अट्टाहास अखेर नडला!
    • प्रवास ग्रंथालयांचा : माहिती संग्रहालय ते आधुनिक ग्रंथालय!
    • ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका
    • अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!
    • बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!
    • ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात
    • फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली
    • संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»शैक्षणिक»टीईटी पेपरफुटीनंतर परीक्षा ढकलली पुढे
    शैक्षणिक

    टीईटी पेपरफुटीनंतर परीक्षा ढकलली पुढे

    परीक्षा ‘या’ महिन्यातमध्ये होण्याची शक्यता
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 2, 2026No Comments118 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    राज्यात नीट पेपर फुटी प्रकरणानंतर एकच खळबळ उडाली होती. हे प्रकरण ताजे असतानाच ठाण्यात शिक्षकांसाठी घेतली जाणारी TET परीक्षेचा पेपर फुटला. याप्रकरणात दिल्ली कनेक्शन समोर आले असून ३ जणांना ताब्यात घेण्यात आले. यानंतर मात्र TET परीक्षा पुढे ढकलण्यात आली. आता ही परीक्षा कधी होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असून महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ही परीक्षा आता नव्याने सप्टेंबर पर्यंत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच यावेळेस कोणतीही हलगर्जी न करता परीक्षा पार पडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

    TET पेपर फुटी प्रकरणानंतर नवीन प्रश्नपत्रिका तयार करणे, त्यांची पडताळणी करणे तसेच सुरक्षा निकषांची पूर्तता करणे या सर्व प्रक्रियेला अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. राज्यातील सुमारे ६ लाख उमेदवारांनी टीईटीसाठी अर्ज केले आहेत. परीक्षा पुढे ढकलली गेल्यास या उमेदवारांची प्रतीक्षा आणखी वाढणार आहे.

    अनेक उमेदवार गेल्या काही महिन्यांपासून परीक्षेच्या तयारीत व्यस्त असून, पुन्हा होणाऱ्या परीक्षेची तारीख अद्याप समोर आलेली नाही. मात्र ही परीक्षा सप्टेंबरपर्यंत लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा पर्यायही शासनाच्या विचाराधीन असल्याची माहिती साम टीव्हीच्या सूत्रांनी दिली आहे.

    शिक्षण विभागाकडून अद्याप अधिकृतपणे नव्या परीक्षेच्या तारखेची घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी लागणारा कालावधी आणि सुरक्षा उपाययोजनांचा विचार करता परीक्षा सप्टेंबर महिन्यात होण्याची शक्यता अधिक असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान आता उमेदवारांचे लक्ष परीक्षेच्या तारखांकडे लागले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण

    August 7, 2026

    पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलच्या तीन विद्यार्थिनींचे घवघवीत यश

    August 4, 2026

    वृक्षसंवर्धनाचा वंजारी येथील ग्रामस्थांचा निर्धार!

    August 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif