राज्यात सरकारचे अस्तित्व दिसत नाही… एकनाथ खडसेंचा घणाघात

0

 

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

अधिवेशानाच्या काळात सत्ताधारी एकही आमदार बेरोजगारी, कामगारांच्या प्रश्रावर, शेतकऱ्यांच्या प्रश्रावर बोलत नसल्याने राज्यात सरकाराचे अस्तित्व दिसत नसल्याची टिका आमदार एकनाथ खडसे यांनी विल्हाळे येथे नागरी सत्काराच्या वेळी केली.

भुसावळ तालुक्यातील विल्हाळे येथे विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांची विधान परिषदेत गटनेते पदी निवड झाल्याने ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा काल दि.३० गुरुवार रोजी नागरी सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलतांना दिपनगर येथील औष्णीक विज केंद्राच्या राखे मुळे परिसरातील गावे बाधीत झाले आहेत, त्यात सर्वात जास्त विल्हाळे गावाचे नुकसान झाले आहे. गावकऱ्यांना श्वासनाचे त्रास,  फुपुसाचे, दम्याचा विकार होत आहे. असे अनेक प्रकारच्या आजाराने ग्रस्त असलेल्या गावाला विज केंद्र सामाजिक जाबाबदारीचा निधी (सी.आर.एस.फंड) खर्च करून कोणतीच सुवीधा देत नाही.  या राखेतून   शेतकार्‍याचे शेती पिकाचे नुकसान होत असुन त्यांच्या शेतीच्या मालाला हमी भाव मिळण्यासाठी विधान सभेत सरकार मधील एकही आमदार प्रश्र उपस्थीत करून आवाज उठवत नाही, फक्त खोके घेऊन ओके झाल्याने राज्यात सरकारचे अस्तीत्व दिसत नसल्याची टिका आमदार खडसे यांनी केली. अशा आमदारांना मतदानाच्या वेळी घरी बसविण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी माजी आमदार संतोष चौधरी यांनीही स्थानिक आमदारांचे नाव न घेता टिका केली. ते म्हणाले भुसावळ तालुक्यात फक्त कमीशन खोरीचे काम सुरू असल्याने कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ठ आहे.  मतदार संघाचा प्रतिनिधी निवड करते वेळी माझ्या कडून चुक झाली तीच चूक तुम्हीही केली ती चूक सुधारण्यासाठी एकत्रीत प्रयत्न करणार असल्याचे सांगत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत त्यांच्या आनामत जप्त करु असे सांगीतले.

यावेळी विल्हाळे गावकऱ्यांनी आमदार एकनाथ खडसे यांचा जाहीर सत्कार केला. सत्कारावेळी मंचावर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अॅड रविंद्र पाटील, प्रतिभा शिंदे, चंद्रकांत चौधरी, राजेंद्र चौधरी, रविद्र पाटील, दिपक मराठे,  आकाश कुरकुरे उपस्थीत होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाय आर पाटील यांनी केले. तर आभार योगेश पाटील यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.