लोकशाही न्यूज नेटवर्क
रेड्यांच्या टकरीवरुन दोन गटाचा वाद टोकाला गेला आणि या वादातून एकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या झाल्याची घटना जालन्यात उघडकीस आली आहे. तर दोघे गंभीर जखमी झाले. हत्येच्या घटनेने जालना शहरातील मोतीबाग परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यात रेड्यांच्या टकरीवरुन दोन गटात वाद होऊन एकची धारदार शस्त्राने वार करून निर्घृणपणे हत्या केल्याची घटना उघडकीस आलीये. रवी अशोक लाड (वय 28 वर्ष) असं मृत तरुणाचे नाव आहे. हाणामारीच्या घटनेत अन्य दोघे गंभीर जखमी झालेत. जालनाच्या शहरातील मोतीबाग परिसरात रविवारी रेड्यांच्या टकरी लावण्यात आल्या होत्या. त्याठिकाणी दोन गटात वाद निर्माण झाला होता.
टकरी लावण्यावरून सायंकाळच्या सुमारास दोन्ही गट पुन्हा समोरासमोर आले. त्यानेतर झाल्याच्या वादाचे रूपांतर नंतर शिवीगाळ आणि हाणामारीत झाले. या मारहाणीत एका गटातील तिघे गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. यामध्ये प्रेम लाड (वय 20 वर्ष) आणि नरेश अवघड (वय 20 वर्ष) हे सुद्धा जखमी झालेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयित आरोपींना अटक केलीये.

