धरणगांव शिवारात होळी जळाली आणि थंडी पळाली !
धरणगांव- शिवारासह तालुक्यातील आनोरे,धानोरे, गारखेडे परिसरात होळी होताच थंडी पळाली असून तापमानात वाढ झालेली आहे. त्यामुळे निसर्ग चक्रानुसार होळी होताच थंडी जाते, या पारंपारिक म्हणीचा अनुभव तालुका वासीयांना आला आहे.

यावर्षी पावसाळा अधिक प्रमाणात असल्याने थंडी देखील चांगली जाणवत होती.गुरूवारी होळी अर्थात शिमग्याचा सण जिल्ह्यात साजरा झाला. यानंतर मात्र शुक्रवार पासून तापमानात वाढ जाणवू लागली. सकाळी थंडावा देखील कमी झाल्याने दुपारी उकाळा वाढला आहे.
पुढील अडीच महिने मोठ्या प्रमाणात उन्हाचा तळाका आता नागरिकांना सहन करावा लागणार आहे. त्यामुळे नागरिक देखील उष्मा पासून आपले संरक्षण करण्यासाठी उपाय शोधू लागले आहेत. बागायती रूमाल खरेदी देखील मोठ्या प्रमाणात वाढली असून थंड पेयाची दुकाने सुरू झाली आहेत.


