मालेगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;
सत्तापालट झाल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मालेगाव दौर्यावर येत आहेत. त्यांच्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर आमदार व माजी कृषीमंत्री दादा भुसे यांनी मालेगाव स्वतंत्र जिल्हा घोषित व्हावा अशी मागणी केली आहे.
शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर सत्तापालट होऊन एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री झालेत, त्यानंतर प्रथमच ते राज्याच्या दौऱ्यावर निघाले आहेत. ते आज मालेगाव येथे नियोजित कार्यक्रमासाठी येत असल्याने तेथील आमदार दादा भुसे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की, गेल्या ४० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जिल्ह्याच्या निर्मितीच्या मागणीला एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यानिमित्त केली जाणार असल्याचे म्हटले आहे. तसेच विभागीय आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार असल्याने सकारात्मक निर्णय येणार असल्याची दादा भुसे यांनी आशा व्यक्त केली आहे.