कत्तलीसाठी नेणाऱ्या गुरांची सुटका, चौघांवर गुन्हा दाखल

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

तालुक्यातील कोळवद गावाजवळील खडकाई नदीच्या पात्राजवळुन गुरांना बेकायदेशीररित्या कत्तलीसाठी घेवून जाणाऱ्या दोघांवर यावल पोलिसांनी कारवाई केली. तसेच ७ गुरांची सुटका करून त्यांना गोशाळेत रवाना केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल तालुक्यातील कोळवद गावाच्या नजीक असलेल्या खडकाई नदीच्या पात्राजळुन दोन जण हे गुरांना कत्तलीसाठी घेवुन जात असल्याची गोपनीय माहीती यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस कर्मचारी बालक बाऱ्हे, भुषण चव्हाण, अनिल साळुंखे आणि गणेश ढाकणे यांनी गुरुवार दिनांक ९ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता धडक कारवाई केली.

यात बेकायद्याशीर गुरे घेवुन जाणाऱ्या संशयीत आरोपी शराफत अली आशिक अली (वय ५३) आणि शोएब अराफत अली (वय १८) दोघे राहणार मारूळ तालुका यावल हे गुरे घेवुन जात होते. या संदर्भात पोलीसांनी या दोघांना विचारणा केली असता त्यांनी सांगीतले की ही गुरे जाकीर कुरेशी व ईब्राहीम कुरेशी दोन्ही राहणार यावल यांच्या मालकीचे असुन सदरची ही गुरे यावल येथे कत्तलीसाठी घेवुन जात असल्याची माहीती दिली. दरम्यान पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेवुन गुरांची सुटका करण्यात केली.

याबाबत पोलीस कर्मचारी गणेश ढाकणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात संशयित आरोपी शराफत अली आशिक अली, शोएब शराफत अली, जाकीर कुरेशी व ईब्राहीम कुरेशी या चार जणांविरूद्ध विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत असुन गुरांची यावलचे पशु चिकित्सक डॉ. आर. सी. भगुरे यांच्याकडुन उपचार करुन गुरांना निमगाव येथील गोवर्धन गोशाळेत पाठविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.