चाळीगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
तालुक्यातील तरवाडे येथील १५ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा शेतातील विहिरीत मृतदेह आढळून आल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. समाधान दगा बागूल हा तरुण मित्रांच्या पार्टीत जेवायला गेला होता. मात्र आज दि,२९ रोजी शहरालगत असलेल्या करगाव गणपती लगतच्या विहिरीत मृतदेह आढळून आला आहे.
याप्रकरणी सुरुवातीला चाळीगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली होती. परंतू आता शहर पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यावर मात्र त्याच्या कुटुंबीयांनी घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. प्राप्त माहितीनूसार तरुणाला उत्तमरित्या पोहता येत होते. त्यामुळे त्याचा पाण्यात बुडून कसा मृत्यू झाला ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याप्रकरणाची पोलिसांनी कसून चौकशी करण्याची मागणी यावेळी होत आहे.