मुंबई : कोरोनाच्या संसर्गाने भारतासह महाराष्ट्रात थैमान घातले आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या ४९ वर पोहोचली आहे. दरम्यान, करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून वेगवेगळी पावले उचलण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत धावणारी एसी लोकल उद्यापासून बंद करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. पुढील आदेश येईपर्यंत ही लोकल सेवा बंद राहणार आहे.
एसी लोकलमधील थंड हवेमुळे कोरोना पसरण्याचा धोका आहे. यामुळे या एसी लोकल बंद ठेवण्यात येणार आहेत. केवळ साध्या लोकलच सुरु राहणार आहेत. मात्र, या लोकल ट्रेनही 50 टक्केच प्रवाशी असतील अशा चालविल्या जाणार आहेत. यामुळे कदाचित काही लोकल रद्द करण्याची शक्यता आहे.