Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ओझरखेडा तलावामध्ये हतनूर धरणाचे पाणी!
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»अपघात»तीन मजली इमारतीतील कोचिंग क्लास आगीत खाक
    अपघात

    तीन मजली इमारतीतील कोचिंग क्लास आगीत खाक

    १५ विद्यार्थ्यांचा मृत्यू : मुख्यमंत्र्याकडून चौकशीचे आदेश
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 23, 2026No Comments352 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथील अलीगंज परिसरातील पुरानिया भागात सोमवारी घडलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. तीन मजली इमारतीला लागलेल्या आगीत १५ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर कोचिंग सेंटर आणि वाचनालय चालवले जात होते. तसेच इमारतीच्या तळमजल्यावर पेट शॉप, तर वरच्या मजल्यावर गेमिंग झोन होता. सोमवारी अचानक इमारतीला आग लागल्यानंतर काही क्षणांतच धूर आणि आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण इमारत वेढली. त्यामुळे इमारतीत उपस्थित विद्यार्थी आणि कर्मचारी घाबरून गेले.

    प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, आग इतक्या वेगाने पसरली की अनेकांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. जीव वाचवण्यासाठी काही जण बाल्कनीत आणि छतावर धावले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून अनेकांना बाहेर काढले. मात्र, काही विद्यार्थ्यांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत १५ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून चार जणांवर उपचार सुरू आहेत.

    जखमींना केजीएमसी ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. बचावकार्य पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या घटनेबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तत्काळ दखल घेतली असून त्यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. तसेच प्रधान सचिव (गृह) आणि डीजीपी यांना घटनास्थळी पाठवून घटनेच्या कारणांची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

    दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या दुर्घटनेमुळे इमारतींमधील अग्निसुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड

    August 11, 2026

    खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!

    August 11, 2026

    भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली

    August 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif