‘आम्हीही 3 महिन्यांपूर्वीच मॅच जिंकली’, मुख्यमंत्री शिंदेंची टोलेबाजी

0

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

काल झालेल्या क्रिकेट सामन्यात भारताने पाकिस्तानवर विजय (Ind Vs Pak) मिळवला. या विजयाचा संपूर्ण भारतभर जल्लोष करण्यात आला. ठाण्यात दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित कण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी हजेरी लावली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी जोरदार टोलेबाजी केली.

शिवसेनेमध्ये बंडखोरी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. भारताने ज्या प्रकार पाकिस्तानवर विजय मिळवला. त्याप्रमाणेच आम्हीही तीन महिन्यांपूर्वी मॅच जिंकली. राज्यात परिवर्तनाचं सरकार आणलं.   ‘देवेंद्र फडणवीस आणि आम्ही ठरवलं, सर्व सण साजरे करायचे. मग गोविंदा असेल, दसरा असेल किंवा दिवाळी असेल. आपण इंडिया पाकिस्तानची मॅच जिंकली. काय जल्लोष केला काल सर्वांनी. असं शिंदे म्हणाले.

तसेच मेलबॉर्न स्टेडिअमवर बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shiv Sena) पोहोचली होती. कुणाच्या तरी हातात, आमच्या पक्षाचे बॅनर होते. आम्हीही 3 महिन्यांपूर्वी मॅच जिंकली, राज्यात परिवर्तनाचं सरकार आलं आणि राज्यात विकासाचं पर्व सुरू’ असं म्हणत एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीला टोला लगावला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.