Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिक्षकाचे चौथीच्या ५ विद्यार्थिनींशी अश्लील चाळे
    • तर अमेरिका इराणचे सर्वकाही नष्ट करेल..
    • फरार फौजदारासह पुत्राला अटक
    • इराण-इस्त्रायल युद्धामुळे साखरेचा गोडवा हरवला
    • सावित्रीमाईंची क्रांती हाच स्त्री शिक्षणाचा खरा आधार!
    • पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते महामंडळे लवकरच स्थापन करणार!
    • स्थानिक आणि संजय गांधी उद्यान प्रशासनात वाद!
    • हुंडाबळीच्या घटना पुरोगामी महाराष्ट्रात धक्कादायक!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»ग्रामीण भागात मुलांची लग्ने जुळेना; पालक चिंतेत!
    जळगाव जिल्हा

    ग्रामीण भागात मुलांची लग्ने जुळेना; पालक चिंतेत!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 19, 2026No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    बी. एन. पाटील

    भातखंडे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    ग्रामीण भागात सध्या मुलांच्या विवाहाचा प्रश्न गंभीर बनत चालला असून अनेक पालक चिंतेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शिक्षण, नोकरी, स्थलांतर आणि बदलत्या सामाजिक अपेक्षा यामुळे मुलांची लग्ने उशिरा होत आहेत किंवा जुळतच नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

    पूर्वी गावोगावी नातेसंबंधांमधून, ओळखीच्या माध्यमातून किंवा समाजातील मध्यस्थांद्वारे लग्ने सहज जुळत असत. मात्र आता मुलींचे उच्च शिक्षण, शहरांकडे वाढलेले आकर्षण, स्थिर नोकरीची अपेक्षा आणि आर्थिक निकष यामुळे जुळवाजुळव कठीण होत चालली आहे. परिणामी, अनेक सुशिक्षित व समंजस मुलांचे विवाह वर्षानुवर्षे रखडत आहेत. पालकांचे म्हणणे आहे की, “मुलगा शेतीशी जोडलेला असेल किंवा गावात राहत असेल तर मुलीकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. शहरात नोकरी, घर आणि आधुनिक सुविधा असाव्यात, अशी अपेक्षा वाढली आहे.” त्यामुळे ग्रामीण जीवनशैलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याचे जाणवत आहे.

    समाजातील जाणकारांच्या मते, विवाहसंस्थेबाबत बदलत्या विचारसरणीचा स्वीकार करताना ग्रामीण भागातील वास्तवही लक्षात घेतले पाहिजे. शेती, व्यवसाय किंवा स्थानिक रोजगार यांनाही सन्मान मिळाला, तर हा ताण कमी होऊ शकतो. तसेच विवाह जुळविताना अनाठायी अपेक्षा कमी करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. दरम्यान, काही सामाजिक संस्था आणि मंडळे विवाह मेळावे, परिचय संमेलने आयोजित करून या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र समाजाने एकत्रितपणे पुढाकार घेतल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही, असेही मत व्यक्त होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जिल्ह्यात तापमानाने ओलांडली चाळीशी!

    March 10, 2026

    पोलिस कॉन्स्टेबलने संपविले जीवन!

    March 9, 2026

    भारनियमनामुळे बळीराजा हतबल!

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.