छत्रपती संभाजीनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) या नावावरून अनेक वाद झाले. आणि त्यामुळेच अनेक अडथळे हे निर्माण करण्यात आले होते. छत्रपती संभाजीनगर नामांतरावरचे सगळे अडथळे आता दूर होतील आणि छत्रपती संभाजीनगर हेच नाव कायम राहणार, यावर आता शिक्कामोर्तब होणार असं दिसून येत आहे. कारण केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्णयानंतर नागरिकांनीही समर्थनांचे पत्र विरोधापेक्षा जास्त दिलेत. त्यामुळे गेल्या 35 वर्षांपासून सुरू असलेल्या नामांतराच्या राजकारणाचा धुरळा शांत होईल, अशी चिन्हे समोर येत आहे.
औरंगाबादचं नाव संभाजीनगर करावं ही 35 वर्षांपासून मागणी होती. आणि ती मागणी झाली. मात्र, काही खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil), एमआयएम पक्ष आणि मुस्लिम संघटनांनी विरोध करीत आंदोलन सुरू केले. शिवाय कोर्टाचीही पायरी चढली. पण आता ते टिकणार नाही आणि छत्रपती संभाजीनगरच हे नाव कायम राहील असे स्पष्ट दिसते आहे.