Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!
    • दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!
    • निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!
    • सर्वसामान्यांचा वारकरी..!
    • भेसळ, मानकांबाह्य अन्नपदार्थांवर औषध प्रशासनाची कारवाई
    • उद्योग-नोकरीपेक्षा शेतीच आहे श्रेष्ठ!
    • केवायसीच्या नावाखाली 100 रुपयांची लाच
    • कार्यकर्त्यांचे ‘पालक’!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»चाळीसगावकर धुळीमुळे हैराण
    जळगाव जिल्हा

    चाळीसगावकर धुळीमुळे हैराण

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 12, 2023Updated:January 12, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क
    चाळीसगाव – चाळीसगाव शहरातील मुख्य रस्त्यावरील धुळीमुळे दुकानदार व नागरिक हैरान झालेले आहेत. त्यामुळे नगरपालिकेने तात्काळ उपायोजना करावी अखिल भारतीय मराठा महासंघाची , मुख्याधिकारी चाळीसगाव नगरपालिका यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
    मराठा महासंघाच्या निवेदनात म्हटले आहे की ,चाळीसगाव शहरातील मुख्य रस्त्यावर धुळीचे प्रमाण वाढून शहरातील नागरिक व दुकानदार हैराण झाले असून मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. या धुळीमुळे चाळीसगावातील सुज्ञ नागरिक नगरपालिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत आहे. तसेच केंद्र सरकारने कोरोनाची चौथी लाट येण्याची संकेत दिले आहे. त्यामुळे गर्दीच्या काही ठिकाणी मास्कचे निर्बंध लावले आहेत. या गंभीर बाबीचा विचार करता चाळीसगाव शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने संपूर्ण शहरात योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. याबाबतची तक्रार शहरातील दुकानदार व सुज्ञ नागरिकांनी मराठा महासंघाकडे केली आहे. चाळीसगाव नगरपालिकेने तात्काळ शहरातील मुख्य रस्त्यावरील धुळीमुळे दुकानदार व नागरिक हैराण झालेले असल्यामुळे माती झाडून पाणी मारावे अशीतात्काळ उपयोजना करावी .अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा मराठा महासंघाच्या वतीने मुख्याधिकारी चाळीसगाव नगरपालिका यांना देण्यात आला आहे.
    सदरचे निवेदनावर अध्यक्ष खुशाल बिडे, तालुका अध्यक्ष रमेश पाटील, महिला जिल्हा संघटक प्रतिभा पवार, युवक तालुका अध्यक्ष परमेश्वर पाटील, शहर उपाध्यक्ष संजय पाटील, कार्याध्यक्ष सिद्धांत पाटील, शहर संघटक रवी पाटील, एडवोकेट दीपक वाघ, सुदाम पवार, अनिल गवळी आदींच्या सह्या आहेत.

    शहरातील मुख्य रस्त्यावर माती
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!

    June 5, 2026

    दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!

    June 5, 2026

    निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!

    June 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif