चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
जामडी येथे तरबेज शहा याकुब शहा याचा खून तर दुसर्या घटनेत देवळी येथील शेतकरी राजेंद्र सकदेव जाधव याला फाशी देवून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. चाळीसगाव तालुक्यात एकाच दिवशी दोन खुणांच्या घटना घडल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.
सविस्तर माहिती अशी कि, रात्री तीन साडेतीन वाजेच्या सुमारास देवळी येथील शेतकरी राजेंद्र सुखदेव जाधव (पाटील) (50) हे शेतकरी आपल्या उंबरखेड शिवारातील शेतात गेले असता अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांना लाठ्या काठ्यांनी मारून नंतर दोरखंडाने फाशी दिल्याचे समजते या घटने बाबत मेहुणबारे पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुसऱ्या घटनेत चाळीसगाव तालुक्यातील जामडी येथील गायबन शहा बाबाच्या दर्ग्यावर दुपारी एका फकीर तरुणाचा धारदार हत्याने खून करण्यात आल्याची धक्केदायक घटना घडली आहे. तरबेज शहा याकुबशहा (35) रा.जामडी असे मयत तरुणाचे नाव आहे. तो गैबंशहाबाबा दर्ग्यावर काम करतो दरम्यान धार्मिक विधीचा एक भाग म्हणून फातिमा वाचत असताना पाठीमागून एक युवक धावत आला व त्याने तीक्ष्ण हत्याराने पाठीवर वार केला, आणि वार करून पळ काढला. या प्रकाराने तेथे उपस्थित भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली. जखमी तरबेज यास उपचारार्थ रुग्णालयात आणत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी संशयित शेख इद्रीस शेख भिकन रा. जामडी (१६) यास ताब्यात घेतले आहे.