मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;
शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस च्या महाविकास आघाडी सरकारने विधानपरिषदेत राज्यपालांकडून नियुक्त करण्यासाठी दिलेली आमदारांची यादी रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. राजभवनने मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवलेल्या पत्रात महाविकास आघाडी सरकारने पाठवलेली आमदारांची यादी रद्द करण्यात येत असल्याचं सांगितलं आहे. “दीड वर्ष प्रलंबित यादी” रद्द करण्यासाठी काल मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे शिफारस केली होती. त्यानंतर राज्यपालांनी हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.