Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आयटी कंपनीतील हिंदू मुलींचे धर्मांतर करून मानसिक छळ!
    • रमेशकुमार मुनोत यांचा मोफत जलकुंड-परळ वाटप उपक्रम सुरूच!
    • जिल्ह्यासाठी पुढील आठवडा ठरणार तापदायक!
    • नवनियुक्त सीर्इओ करिश्मा नायरांनी पदभार स्वीकारला
    • तोल जावुन पडल्याने प्लबींग कारागिराचा मृत्यू
    • जळगाव सराफ बाजारात सोन्या-चांदीची चकाकी वाढली
    • शूद्रातिशूद्रांना हक्काची जाणीव करुन देणारे : ‘क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले’!
    • हायकोर्टाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांचा राजीनामा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»मतदान सुरु होण्याआधीच  काँग्रेसला मोठा धक्का
    राजकारण

    मतदान सुरु होण्याआधीच  काँग्रेसला मोठा धक्का

    बड्या नेत्याने तडकाफडकी दिला राजीनामा
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 9, 2026No Comments390 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    आसामसहित तीन राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. या मतदानादरम्यान काँग्रेसला आसाममध्ये मोठा धक्का बसला आहे. मतदान सुरू होण्याच्या काही तासाआधीच काँग्रेसचे उदलगुरी मतदारसंघातील उमेदवार सुरेन दायमारी यांनी माघार घेतली आहे. तसेच त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देखील दिला आहे.

    सुरेन दायमारी यांनी माध्यमांशी संवाद साधत काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. तसेच निवडणुकीतून माघार घेत असल्याचेही स्पष्ट केले. दायमार यांनी निडवणुकीतून माघार घेतली असली तरी, त्यांचं नाव ईव्हीएममध्ये असणार आहेत. त्यांनी मतदानाच्या काही तास आधीच माघार घेत असल्याचे जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काँग्रेस प्रवक्त्यांनी सांगितलं की, ‘त्यांनी माध्यमांशी येऊन काँग्रेस पक्ष सोडल्याचे सांगितले. परंतु त्यांनी पक्षाला अधिकृतपणे राजीनामा पाठवलेला नाही’.

    दायमारी यांनी म्हटलं की, ‘काँग्रेसमध्ये राहून काही फायदा नाही. माझ्यासोबत विश्वासघात झाला आहे. काँग्रेस केवळ अल्पसंख्यांकांसाठी काम करते. त्यांनी माझ्या आदिवासी समाजाला कोणताही अधिकार दिला नाही. त्यांच्यासाठी काही केलं नाही’.

    ‘काँग्रेसने मला उदलगुरी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी दिली. परंतु पक्षाने माझा प्रचार केला नाही. मी पक्षाकडे अनेकदा प्रचाराची मागणी केली. परंतु पक्षातील नेत्यांनी माझा फोन उचलला नाही. माझी कोणी मदत केली नाही, याचं दु:ख होत आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीने देखील साथ दिली नाही, असे दायमारी यांनी सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    हायकोर्टाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांचा राजीनामा

    April 10, 2026

    इतिहासात पहिल्यांदाच ईव्हीएम तपासण्याचे आदेश

    April 10, 2026

    मुख्यमंत्री पदापेक्षा शिंदेंचं नाव देशात मोठं

    April 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.