Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ओझरखेडा तलावामध्ये हतनूर धरणाचे पाणी!
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»अध्यात्म»अनेर-सातपुडा परीसरात बिबट्याचा धुमाकूळ ; १५ दिवसांत चार जनावरे फस्त
    अध्यात्म

    अनेर-सातपुडा परीसरात बिबट्याचा धुमाकूळ ; १५ दिवसांत चार जनावरे फस्त

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 18, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अनेर-सातपुडा परीसरात बिबट्याचा धुमाकूळ ; १५ दिवसांत चार जनावरे फस्त

    लासूर ता.चोपडा(वार्ताहर) – चोपडा तालुक्यातील सातपुडा व गणपूर परीसरात गेल्या पंधरा दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून पंधरा दिवसांत तब्बल चार पाळीव प्राण्यांवर हमला करत फस्त केली आहेत.

    पंधरा दिवसांपूर्वी कर्जाने येथील आदिवासी शेतकर्याची गाय व त्यानंतर बरोबर चार चार दिवसांच्या अंतराने चौगाव येथील नाना भावसिंग राजपूत, प्रभाकर लक्ष्मण पाटील यांच्या शेतात बांधलेल्या बैलांवर रात्रीच्या वेळी हमला करत फस्त केले तर दि.१७ मार्च रोजी रात्री गणपूर शिवारातील साळुंखे भाऊसाहेब यांच्या शेतातील रखवालदार सखाराम महार्या बारेला यांच्या मालकीच्या गायीला ठार केले.गायीला ठार केल्यावर रखवालदार सखाराम बारेला यांना समजल्यानंतर त्यांनी आरडाओरड केल्यावर बिबट्याने काढता पाय घेतला.

    त्यानंतर संबंधित शेतकर्यांनी चोपडा वनक्षेत्रपाल बी.के.थोरात यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क केला.त्यावेळी सातपुड्यात गस्तीवर असलेल्या वनक्षेत्रपाल बी.के.थोरात, वनपाल जयप्रकाश सुर्यवंशी वनरक्षक अमोल पाटील,शुभम पाटील, प्रकाश पाटील , गोविंदा चौधरी यांनी गणपूर शिवारात रात्री ११ वाजून ४०मिनीटांनी जाऊन सदर घटनेची माहिती घेतली.व वनक्षेत्रपाल बी.के.थोरात यांनी शंभर टक्के नुकसान भरपाई मिळवून देणार असल्याचे आश्वासन दिले व ज्या ज्या भागात बिबट्या अस्तित्व आढळेल त्या भागात कॅमेरे लावण्याचे आदेश वनपाल व वनरक्षकांना दिलेत तसेच वन्यजीवांपासुन स्वतःचे व पाळीव प्राण्यांची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले.

    त्यानंतर दि.१८ रोजी लासुर राऊंड मधील प्रत्येक गावात जाऊन वनपाल, वनरक्षक व वन मजूर यांनी वन्यप्राणी व मानवी संघर्ष टाळण्यासाठी जनजागृती केली.

    सदर वन्यप्राण्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करून शेतकरी व शेतमजूर यांच्यातील भीतीचे वातावरण दूर करावे अशी मागणी चुंचाळे,कर्जाने, क्रुष्णापूर, चौगाव,लासुर, गणपूर,मराठे व गलंगी या भागातून होत आहे.

    #crime Chopda news
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक

    August 11, 2026

    वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा

    August 11, 2026

    राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक

    August 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif