भुसावळ मध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क

जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी बदलली वाऱ्यासह पाऊस झाला. जिल्ह्यात भुसावळ (Bhusawal), चाळीसगाव (Chalisgaon) तालुक्यांतील काही भागांत शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने (Unseasonal rain) जोरदार हजेरी लावली. यामुळे गहू, मका, हरभरा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यात तीन ते चार तास विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत होता. दिवसभर उन्हाच्या तडाख्याने आधीच नागरिक त्रास असताना त्यात जोरदार हवेमुळे वीज गायब झाल्याने नागरिकांचे चांगलेच हाल झाले. भुसावळ शहरासह तालुक्यात दिवसभर रखरखत्या उन्हाने तसेच सायंकाळी अचानक हवेने रूद्र रूप धारण केल्याने पावसाने तब्बल दोन तास चांगलाच धिंगाणा घातला. यामुळे नाले ओसंडून वाहत होते. आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान देखील झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.