मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यपालांच्या वक्तव्यावर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढेंनी निशाणा साधला आहे. “महाराष्ट्राची बदनामी थांबवा आणि माफी मागा नाहीतर मोठे आंदोलन करु, असा इशारा लोंढेंनी राज्यपालांना दिला आहे. अतुल लोंढे म्हणाले की राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अशोभनीय वक्तव्य केलेले असून त्यांनी मराठी माणसाचा अपमान केला यामुळे आपण महाराष्ट्राची माफी मागावी.
तसेच लोकांना सोबत घेऊन जाण्याची महाराष्ट्राची प्रवृत्ती असल्याने इतर लोक प्रगत झाले आहेत. हे राज्यपालांनी विसरू नये. नाहीतर हीच लोकं गुजरात आणि राजस्थानमध्ये प्रगत का झाली नाहीत? असा जाब देखील लोंढे यांनी राज्यपालांना विचारला असून आपण महाराष्ट्राची बदनामी थांबवावी असे लोंढेंनी म्हटले आहे.