Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदीत्य जीवने यांनी घेतला आयुक्तपदाचा पदभार
    • पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले
    • मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक
    • उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या खाजगी विमानात बिघाड
    • जिल्ह्यात १० वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून
    • अल्पवयीन तरुणांकडून चक्क जिम मालकावर गोळीबार
    • ‘धुरंधर’मुळे यश मिळालं, तेव्हा त्यांनी आवाज उठवला
    • ते सर्व फक्त सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»लोकशाही विशेष»भावनांना शब्दांचा स्पर्श झालेला ६५ कवितांचा काव्यसंग्रह : ‘भावतरंग’
    लोकशाही विशेष

    भावनांना शब्दांचा स्पर्श झालेला ६५ कवितांचा काव्यसंग्रह : ‘भावतरंग’

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 30, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही विशेष लेख

    उत्कृष्ट साहित्य निर्मितीचे 15 पुरस्कार मिळालेल्या ‘संघर्षाचं सोन’ या आत्मकथनानंतर कवी त्यात्याराव चव्हाण यांनी आपल्या 65 व्या वाढदिवसानिमित्त ६५ विविध कवितांचा काव्यसंग्रह प्रकाशित करुन जगण्याची उमेद निर्माण केली आहे. भावनांना शब्दांचा स्पर्श झालेला ६५ कवितांचा हा काव्यसंग्रह आहे.

    ‘भावतरंग’ काव्यसंग्रह कवीच्या संघर्षाची, देशभक्तीची, सामाजिक चिंतनाची, वैचारिक उंचीची आणि एकात्मता, समता या मूल्यात्मक विचारांची ओळख कविता वाचत असताना शब्दातून होते.

    ‘पावन करण्या भारतभुला,

    बळी गेले बहु मोती ।

    आक्रमणाच्या भडकत्या ज्वाला,

    शमवू जागेवरती ।

    भारत भूमीच्या थोर हुतात्म्यांची आठवण सदैव असावी असा मानणारा कवी, ‘सदैव’ या कवितेतून आपणास दिसतो. भावतरंग या काव्यसंग्रहातील कविता परिवार, निसर्ग, शेतकरी, नातेसंबंध, शिक्षण, प्रगती, कल्लोळ, सहकाराची भावना, जीवन जगण्याचा मंत्र, एकजुटीचं तंत्र समजावून सांगतात. ‘आम्ही सारे’ या कवितेत कवी एकतेच्या भावना व्यक्त करताना म्हणतो.

    ‘कुणा आवडो, वा कुणा नावडो

    समता ही काळाची गरज खरी

    सद्भावाने जगू या, प्रेमे जगवू या

    स्वातंत्र्य सुखोपभोग घ्या भुवरी’

    जीवनभर कष्ट करणाऱ्या आणि बिकट परिस्थितीवर मात करून शिकवून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करायला लावणाऱ्या आई आणि बाबा वगुरुजन आणि विद्यार्थी यांना कवीने हा भावतरंग काव्यसंग्रह अर्पण केलेला आहे.

    तात्याराव चव्हाण हे शिक्षण क्षेत्रात शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्या कवितेत समता, स्वातंत्र्य देशभक्ती, सामाजिक भान नातेसंबंध यासह निती मूल्यांची गुंफण दिसते. लेखक तथा माजी शिक्षणाधिकारी पोपटराव काळे यांची प्रस्तावना आणि सुप्रसिद्ध कवी फ. मु. शिंदे यांची पाठराखण भावतरंग या काव्यसंग्रहाचे महत्व अधोरेखित करते. छत्रपती संभाजीनगर येथील कैलास पब्लिकेशन यांनी ‘भावतरंग ‘ हा काव्यसंग्रह प्रकाशित केलेला आहे.

    प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी नातेसंबंध जपत असताना काय करायला पाहिजे. हे भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमानकाळ यांच्या अतुलनिय जोडणीतून ‘नाते जपा ‘या कवितेतून कवी म्हणतो,

    ‘जुन्या विरुद्ध लढण्यासाठी

    वही पेन हाती लेखन पाटी

    वाचाल ग्रंथ मजबूत मस्तक

    नवीन तंत्र अभिनव संगणक’

    मनाच्या भावनांना शब्दांमध्ये गुंफणारा कवी बळीराजाची स्थिती मांडतो. शेतकऱ्याचे दुःख, वेदना शब्दाच्या रुपाने समाजापुढे माणसांना म्हणतो,

    ‘चांगले पीक येईल

    मनी होती आसं

    सततच्या पावसाने

     केले सत्यानाश

    नदीचे पोट फुगले

    संसार थाटे वावरात

    वेदना सांगू कुणा

    चिंता करतो दिनरात’

    तात्याराव चव्हाण शिक्षकी पैशातून सेवानिवृत्त झाले पण काव्यरुपाने साहित्य निर्मितीतून ते समाज शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. याचा प्रत्यय त्यांच्या कवितेच्या प्रत्येक शब्दात ओळी ओळीतून दिसून येतोय. कवीच्या मन पटलावर उमटलेले हे भाव तरंग वाचकांना आवडतील. भावनांना शब्दांचा स्पर्श झालेल्या ६५ कवितांच्या या भावतरंगांचे वाचक स्वागत करतील हा आशावाद आहे. तात्याराव चव्हाण यांच्या लेखन कार्याला हार्दिक शुभेच्छा.

     

    एकनाथ लक्ष्मण गोफणे
    चाळीसगाव
    मो. 8275725423

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    सर्वसामान्यांचा वारकरी..!

    June 5, 2026

    विनोद सम्राट : पद्मश्री अशोक सराफ उर्फ ‘अशोक मामा’!

    June 4, 2026

    लोकनेते गोपीनाथ मुंडे

    June 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif