लोकशाही न्यूज नेटवर्क
अमरावती ; जिल्ह्यातील चिखलदरा पोलीस स्टेशन येथे तालुक्यातील सर्व ग्रामीण भागातील पोलिस पाटलांना बोलावून तालुक्यातील शांतता भंग होऊ नये म्हणून वरिष्ठ पोलिस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसारतालुक्यात साजरा होणाऱ्या महामानवांच्या जयंतीनिमित्त
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ,रामनवमी, हनुमान जयंती,या कार्यक्रमात कोणत्याही मंडळाने डीजे वाजून उत्सव साजरा करू नये. अशा सूचनाशासनाच्या वरिष्ठ अधिकार्याकडून प्राप्त झाल्यानंतर ठाणेदार राहुल वाढवे यांनी तत्काळ सहकारी पोलीस पाटलांची मिटिंग बोलावुन
सर्व पोलीस पाटील यांना सूचना जाहीर केले आहेत कुठेही कानून सुव्यवस्था अबाधित होऊ नये यासाठी त्यांनी आपले मत पोलीस पाटला समोर व्यक्त केले तालुक्यात होणारे सन निश्चितपणे चांगले शांततेने कानून सुव्यवस्था सांगली राखून शांततेने कार्यक्रम पार पाडावे अशे मत त्यांनी व्यक्त केले .
परंतु डीजे वाजविण्यासाठी कुठेही परवानगी दिली जाणार नाही अशीही त्यांनी मत व्यक्त केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आपण सहकार्य देऊन करावे, असे या मीटिंगमध्ये सुचविण्यात आले। चिखलदरा तालुक्यातील सर्व पोलीस पाटील या कार्यक्रमाला उपस्थित होते .
आता हे पाहणे महत्त्वाचे आहे की
या आदेशाची तालुक्यात तंतोतंत पालन होते किंवा विनापरवाना डीजे वाजून जयंती उत्सव साजरी होते हे आता कार्यकर्ते समोर आव्हान आहे .
दबक्या आवाजात चर्चा ऐकावयस मिळाले की आनंद उत्सव व महामानवाची जयंती वर
शासनाची हे प्रतिबंध का असाही दबका सुर शासनाच्या निर्णया च्या विरोधात ऐकाला मिळाला।