मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
अक्षय कुमार (Akshay Kumar) मध्यंतरी ट्रोल झाला होता. ट्रोल करण्याचे कारण काय तर, अभिनेत्याने त्याच्या टूरचा प्रमोशनल व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला होता. या व्हिडीओ सर्वच जण पृथ्वी वर फिरतांना दाखवले आहे. अक्षय कुमारने भारताच्या नकाशावर पाऊल ठेवलेला दिसत आहे. त्यामुळे अभिनेता सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाला होता. आणि त्याच्याकडे भारताचे नागरिकत्व नसून कॅनेडाचे नागरिकत्व असल्याने नेटकरींनी त्याच्यावर सडेतोड टीका केली होती.
त्यावर आता अक्षय कुमारने मोठा वक्तव्य केलं आहे. जवळपास तीन वर्षांपूर्वी अक्षयने सांगितलं होतं की तो लवकरच भारतीय पासपोर्टसाठी अर्ज करणार आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पुन्हा एकदा तो पासपोर्टबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला आहे. “भारत माझ्यासाठी सर्वस्व असून मी पासपोर्ट बदलण्यासाठी अर्ज केला आहे”, असं त्याने सांगितलं. “भारत माझ्यासाठी सर्वस्व आहे. मी जे काही कमावलं आणि मला जे काही मिळालं ते सर्व इथूनच मिळालं. मी नशीबवान आहे की मला त्याची परतफेड करायचीही संधी मिळाली. जेव्हा कोणतीच माहिती नसताना लोक तुमच्याविषयी बोलतात तेव्हा खूप वाईट वाटतं”, असं तो म्हणाला.