Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»जिल्हाधिकाऱ्यांकडून तहसील व भूमी अभिलेख विभागाचा आढावा
    गुन्हे वार्ता

    जिल्हाधिकाऱ्यांकडून तहसील व भूमी अभिलेख विभागाचा आढावा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 11, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जिल्हाधिकाऱ्यांकडून तहसील व भूमी अभिलेख विभागाचा आढावा

    जळगाव प्रतिनिधी जिल्ह्यातील तहसिल कार्यालये आणि भूमी अभिलेख विभागातील कामकाजाचा जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सविस्तर आढावा घेतला. जिल्ह्यातील तहसिलदार, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख तसेच उपअधीक्षक भूमी अभिलेख अधिकाऱ्यांसोबत झालेल्या या बैठकीत मोजणी प्रक्रियेत येणाऱ्या अडथळ्यांपासून ते कार्यालयीन प्रलंबित कामकाजापर्यंत सर्व बाबींची सविस्तर चर्चा झाली.

    बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी श्री.घुगे यांनी जिल्ह्यातील मोजणी प्रक्रियेतील अनावश्यक विलंबाबाबत चर्चा करत, तातडीने सुधारणा करून ही प्रक्रिया अधिक गतीमान करण्याचे निर्देश दिले. प्रलंबित असलेल्या मोजण्या संदर्भात नियोजित वेळापत्रक तयार करून कामे पूर्ण करण्याची दक्षता संबंधित अधिकाऱ्यांनी द्यावी, असेही त्यांनी सांगितले. भूमी अभिलेख विभागातील तांत्रिक सुविधा, मनुष्यबळातील कमतरता, उपकरणांची उपलब्धता, तसेच तांत्रिक त्रुटी अशा विषयांवरही जिल्हाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या विभागांकडून स्वतंत्र आणि सध्यास्थिती अहवाल तातडीने मागविले आहेत.

    तहसिल कार्यालयांतील प्रशासकीय कार्यप्रवाह नागरिकांना दिल्या जाणाऱ्या जमीन प्रकरण सेवांशी थेट संबंधित असल्याने त्यामध्ये आणखी सुलभता आणण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी अधोरेखित केले. जमीन संदर्भातील प्रकरणांचा निपटारा निश्चित कालमर्यादेत करणे अनिवार्य असून, कोणतेही प्रकरण अनावश्यकपणे प्रलंबित ठेवू नये, अशी स्पष्ट सूचना त्यांनी दिली. नागरिकांच्या अपेक्षांनुसार आणि नियमबद्ध पद्धतीने कामकाज होण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

    बैठकीत कामकाजाच्या नियमित परीक्षणालाही विशेष महत्त्व देण्यात आले. प्रगतीचा साप्ताहिक आढावा घेऊन प्रत्यक्ष कामकाजाचा वेग वाढविण्यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले. अधिकारी–कर्मचाऱ्यांनी पारदर्शकतेचे तत्त्व काटेकोरपणे पाळावे, तसेच कोणतीही तक्रार प्रलंबीत राहू नये यासाठी जबाबदारीने आणि शिस्तबद्ध पद्धतीने काम करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

    या बैठकीस अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर ,निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण संबंधीत विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या

    May 13, 2026

    लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात

    May 13, 2026

    तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif