Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»अपघात»एकाच कुटुंबातील ५ जणांचा अपघाती मृत्यू
    अपघात

    एकाच कुटुंबातील ५ जणांचा अपघाती मृत्यू

    ४ गंभीर : भरधाव कारची झाडाला धडक
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 12, 2026No Comments750 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    एका भीषण अपघातात तीन मुलांसह एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना झारखंडमध्ये घडली. अघारामाजवळ भरधाव वेगात असणारी स्कॉर्पिओ थेट झाडावर जाऊन आदळल्यामुळे अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या अपघातात ५ जणांचा जागेवरच मृत्यू झाला, तर ४ जण जखमी आहेत. जखमींना जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती स्थानिक मीडियाने दिली आहे.

    एकाच कुटुंबातील पाच जणांच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये लोहरदगा येथील ५८ वर्षीय गुलाम मुस्तफा, त्यांची पत्नी ५५ वर्षीय गुलशन परवीन आणि तीन मुलांचा समावेश आहे. अपघातात कुटुंबातील इतर सदस्य जखमी झाले आहेत. त्यांना रिम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघातात मृत्यू झालेल्या ५ जणांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी रूग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून पुढील तपास करण्यात येत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, गुलाम मुस्तफा आपल्या कुटुंबासोबत लसिया गावाला जात होते. त्यावेळी अघारामाजवळ त्यांची स्कॉर्पिओ गाडी नियंत्रणाबाहेर जाऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की गाडीचा चक्काचूर झाला आणि पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात हिना परवीन, नेहा परवीन, उमर नवाज हा मुलगा आणि चालक अक्रम खलिफा हे जखमी झाले आहेत. त्यांना रांची येथील रिम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. या भीषण अपघातामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

    अपघाताची बातमी मिळताच रुग्णालयाबाहेर लोकांची गर्दी जमली. कोलेबिराचे आमदार नमन विक्सल कोंगारी, सिमडेगाचे आमदार भूषण बडा आणि इतर लोकप्रतिनिधींनी तीव्र शोक व्यक्त केला. मुस्लिम समाजाचे प्रतिनिधीही पीडितेच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले. त्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif