मुंबई- पुणे महामार्गावर भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

गुरूवारी मध्यरात्री मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर (Mumbai Pune Express Way) बोरघाटात (Bor Ghat) भीषण अपघात (Accident) झाल्याने 5 जण मृत्युमुखी पडले असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

मुंबईच्या दिशेने येत असलेल्या इरटिका कारला एका वाहनाने धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला. सर्व मृत एकाच कुटुंबातील असल्याचे समजते. जखमींना पनवेल येथील एमजीएम हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. उशिरापर्यंत मृत व जखमींची नावे समजू शकलेली नव्हती.

मिळालेल्या माहितनुसार, मुंबईच्या दिशेने येत असलेल्या इरटिका मच्छिंद्र आबोरे (वय 38, रा. पिंपरी चिंचवड) हे चालवित होते. रात्री पावणे बाराच्या मुंबईपासून अलीकडे बोरघाटात ढेकू गावचे हद्दीत एका अज्ञात वाहनाने धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन पडली. आतील प्रवासी दरवाजा तुटल्याने बाहेर पडले. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने काही जणांचा तेथेच मृत्यू झाला.

महामार्गावरून जात असलेल्या वाहनापैकी एका वाहन चालकाने महामार्ग पोलिसांना हा प्रकार कळविला. त्यानंतर काही वेळातच महामार्गावरील आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी येवून मदत कार्य सुरू केले. तिघा जखमींना एमजीएम रुग्णालयात हलविले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

काल रात्री खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दित पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर एर्टिगा कार क्रमांक MH.14.EC.3501 ही गाडी पाठीमागून कंटेनरला वेगात धडकल्याने अपघात झाला. या अपघातामध्ये कारमध्ये असलेल्या एकूण नऊ प्रवाशापैकी पाच प्रवासी मयत झाले असून 4 जण जखमी आहेत. सदरचा अपघात हा ईरटिगा कारच्या चालकाने वाहन वेगात व हयगयीने चालवल्याने झाला असल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती रायगड येथील जिल्हा पोलीस प्रमुख यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.