Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • महामार्ग बायपासचा अट्टाहास अखेर नडला!
    • प्रवास ग्रंथालयांचा : माहिती संग्रहालय ते आधुनिक ग्रंथालय!
    • ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका
    • अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!
    • बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!
    • ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात
    • फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली
    • संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»धान्याने भरलेला ट्रक रेल्वेला धडकला ; मोठी दुर्घटना टळली !
    उत्तर महाराष्ट्र

    धान्याने भरलेला ट्रक रेल्वेला धडकला ; मोठी दुर्घटना टळली !

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 14, 2025Updated:March 14, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धान्याने भरलेला ट्रक रेल्वेला धडकला ; मोठी दुर्घटना टळली !

     

    बोदवड प्रतिनिधी

    राज्यभर धुलीवंदनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच जळगाव जिल्ह्यातील बोदवड रेल्वे स्थानकाजवळ एका भीषण अपघाताची घटना घडली आहे. पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास मुंबई-अमरावती एक्सप्रेसला (गाडी क्रमांक 12111) अपघात झाला. या दुर्घटनेत मोठा अनर्थ टळला असला तरी रेल्वे इंजिनाचे मोठे नुकसान झाले आहे.

    प्राप्त माहितीनुसार, नाडगाव येथील बंद असलेल्या रेल्वे क्रॉसिंगमधून धान्याने भरलेला ट्रक अचानक नियंत्रण सुटून रेल्वे ट्रॅकवर आला. त्याच वेळी, मुंबई-अमरावती एक्सप्रेस बोदवड रेल्वे स्थानकाजवळून जात असताना हा ट्रक थेट रेल्वे इंजिनावर धडकला. ही धडक इतकी जोरदार होती की ट्रकचे तुकडे-तुकडे झाले.

    अपघात होताच रेल्वे चालकाने प्रसंगावधान राखत तातडीने ब्रेक लावले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. स्थानिक नागरिक आणि रेल्वे प्रशासनाने त्वरित घटनास्थळी धाव घेतली. रेल्वे प्रशासनाच्या आपत्कालीन यंत्रणेने वाहतूक सुरळीत करण्यासाठी तत्काळ उपाययोजना सुरू केल्या आहेत.

    या अपघातामुळे काही काळ रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, रेल्वे प्रशासनाने तातडीने कामगिरी करत मार्ग मोकळा केला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी प्रवाशांमध्ये काही काळ गोंधळ उडाला होता. दरम्यान, ट्रक चालक अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

    रेल्वे विभागाकडून या अपघाताच्या कारणांची चौकशी सुरू असून संबंधित अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी अधिक दक्षता घेतली जाईल, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

    accident Bodvad jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!

    August 10, 2026

    बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!

    August 10, 2026

    फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली

    August 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif