Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग
    • महामार्गावर तीन नव्हे, चार उड्डाणपूल हवेत!
    • गुटखा, पान मसाला आणि इतर प्रतिबंधित उत्पादनांवर बंदी
    • मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली
    • दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन
    • वंदे मातरम्‌‍ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण!
    • भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी
    • मराठी येत नसल्यास चालकाचे लायसन्स होणार रद्द!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»अपघात»भरधाव कार ५०० फूट खोल दरीत कोसळली
    अपघात

    भरधाव कार ५०० फूट खोल दरीत कोसळली

    ७ जणांचा मृत्यू : ६ जण एकाच कुटुंबातील
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 19, 2026No Comments582 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    हिमाचल प्रदेशमध्ये भयंकर अपघात झाला. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील ६ जणांसह ७ जणांचा मृत्यू झाला. हिमाचल प्रदेशच्या चंबा जिल्ह्यामध्ये भरधाव कार दरीत कोसळून हा अपघात झाला. या अपघातामध्ये ४ पुरूष आणि ३ महिलांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी पहाटे पुखरी-मसरुंद रस्त्यावर मनी झिरोजवळ भरधाव कार अनियंत्रित होऊन ५०० फूट खोल दरीत कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की कारमधील ७ जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील ६ जणांचा समावेश आहे. अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला. हे सर्वजण मुंडन समारंभामध्ये सहभागी झाल्यानंतर घराकडे परत जात असताना ही घटना घडली.

    या अपघातामध्ये चुन्नी लाल (६५ वर्षे), देवी लाल (६२ वर्षे), बबली देवी (४५ वर्षे), मोती राम (५० वर्षे), अनिता कुमारी (२० वर्षे), कुंता देवी (५३ वर्षे) आणि मनोहर लाल (३४ वर्षे) या सात जणांचा मृत्यू झाला. चुन्नीलाल, देवीलाल आणि मोतीराम हे सख्खे भाऊ होते. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. कार थेट दरीत कोसळली. या अपघाताचा तपास पोलिस करत आहेत.

    कुठेड पंचायतीचा भाग असलेल्या महाल गावातील रहिवासी मुंडन सोहळ्याला हजेरी लावून घरी परतत असताना हा अपघात घडला. हे कुटुंब आणि गावकरी काकाडोथा गावात आयोजित एका धार्मिक सोहळ्याला उपस्थित राहिले होते आणि रात्री उशिरा सोहळ्यावरून परतत असताना भीषण अपघात झाला. या घटनेमुळे महाल गाव आणि आसपासच्या परिसरात शोककळा पसरली आहे. एकाच वेळी ७ जणांच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग

    August 12, 2026

    मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली

    August 12, 2026

    दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif