Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
    राजकारण

    माणसाने झेपेल तितकेच बोलावे!

    सदाभाऊ खोतांवर रोहिणी खडसेंचा हल्ला
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 17, 2026No Comments166 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    पवार कुटुंब हे कधीच पुरोगामी नव्हते, अशी टीका आमदार सदाभाऊ खोत यांनी केली होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सदाभाऊ खोत यांना चांगलेच सुनावले आहे. पुरोगामी विचार तुम्हाला झेपण्यापलिकडचे आहेत, त्यामुळे फार बाता मारून नका, असा इशाराच त्यांनी खोत यांना दिला आहे.

    रोहिणी खडसे यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून ही प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, सदाभाऊ, तुम्ही ज्या पवार कुटुंबीयांवर बोलताय त्या कुटुंबाचा भाग आदरणीय अजितदादा पण आहेत, ज्यांचा प्रचार तुम्ही आणि तुमचे सवंगडी करत आहेत त्या आदरणीय सुनेत्रा वहिनी सुद्धा त्याच कुटुंबाचा भाग आहे. रोहिणी खडसे पुढे म्हणाल्या की, कसंय ना, माणसाने झेपेल तितकंच बोलायला हवे! तुमचा आणि पुरोगामी विचारांचा संबंध येतो का? शरद पवारांच्या मातोश्री ब्रिटिश राजवटीत पुणे लोकल बोर्डाच्या सदस्य होत्या. शरद पवारांचे वडील हे सत्यशोधक चळवळीत काम करायचे तसेच शिक्षणाची गंगा बहुजनांच्या प्रत्येक घरात पोहोचावी यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आयुष्यभर कष्ट घेतले. त्यात शरद पवारांच्या वडिलांनी त्यांना मोलाची साथ दिली. इतकंच काय जिथं प्रतिगामी लोक वंशाचा दिवा पाहिजे म्हणून मुलगा व्हावा याचा अट्टाहास करतात, तिथे पवार साहेबांनी मुलीच्या जन्माचे स्वागत केले, असे म्हणत त्यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा साधला.

    बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले आहे. यावरून बोलताना सदाभाऊ खोत यांनी पवार कुटुंबावर टीका केली. शरद पवार यांचे कुटुंब हे कधीच पुरोगामी नव्हते. पुरोगामी पणाच्या आडोशाने सत्तागामी हाच एक कलमी कार्यक्रम पवारांनी व त्यांच्या कुटुंबाने महाराष्ट्रात राबवला आहे. राज्यात शाहू, फुले आणि आंबेडकरांचे नाव घेऊन मतांचा पुरोगामी जोगवा मागायचा. सत्तेच्या खुर्चीवर आरूढ होतात, मला पुरोगाम्यांना विचारायचं आहे ते आता आंधळे, बहिरे झाले आहेत का ? असा सवाल उपस्थित करत त्यांनी पवारांवर हल्लाबोल केला होता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात

    May 14, 2026

    खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर

    May 13, 2026

    पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif