Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • महामार्ग बायपासचा अट्टाहास अखेर नडला!
    • प्रवास ग्रंथालयांचा : माहिती संग्रहालय ते आधुनिक ग्रंथालय!
    • ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका
    • अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!
    • बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!
    • ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात
    • फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली
    • संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»पोलीस मुख्यालयातच डीजीपी यांचा संशयास्पद मृत्यू
    गुन्हे वार्ता

    पोलीस मुख्यालयातच डीजीपी यांचा संशयास्पद मृत्यू

    मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट : उडली मोठी खळबळ
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 20, 2026Updated:July 20, 2026No Comments759 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    त्रिपुराचे पोलीस महासंचालक अनुराग धनखड यांचा मृतदेह अगरतळा येथील पोलीस मुख्यालयात आढळून आल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पोलीस विभागासह प्रशासकीय वर्तुळातही मोठी चर्चा सुरू झाली आहे. त्यांचा मृतदेह तातडीने अगरतळा येथील गोविंद बल्लभ पंत रुग्णालयात नेण्यात आला. मात्र, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

    मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अनुराग धनखड यांचा मृतदेह त्यांच्या केबिनमध्ये संशयास्पद परिस्थितीत आढळून आला. प्राथमिक अंदाजानुसार, आत्महत्येची शक्यता व्यक्त केली असली तरी अधिकृतरीत्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे मृत्यूमागील कारणांचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि फॉरेन्सिक पथकांकडून सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.

    अनुराग धनखड हे १९९४ बॅचचे भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. २०२५ मध्ये त्यांची त्रिपुराच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात आले होते.

    धनखड यांनी सीबीआयमध्ये कार्यरत असताना देशातील गाजलेल्या नीरव मोदी प्रकरणाच्या तपासाचे नेतृत्व केले होते. तसेच १९८४ मधील शीखविरोधी दंगलींच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे SIT चे नेतृत्वही त्यांनी केले होते. त्यामुळे ते एक अनुभवी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे पोलीस दलात शोककळा पसरली असून, त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण काय? याचा तपास सुरु आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका

    August 10, 2026

    अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!

    August 10, 2026

    ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात

    August 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif