Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गाच्या मोजणीचा सावळा गोंधळ!
    जळगाव जिल्हा

    बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गाच्या मोजणीचा सावळा गोंधळ!

    शेतकरी मात्र वाऱ्यावर : कागदी घोडे नाचवण्यात अधिकारी मग्न
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 6, 2026No Comments461 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    धानोरा, ता. चोपडा

    तीन राज्यांना जोडणाऱ्या आणि केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गाच्या चौपदरीकरणाने सध्या प्रशासकीय सर्कस सुरू केली आहे. एकीकडे कोट्यवधींच्या निधीच्या गप्पा मारल्या जात असताना, दुसरीकडे भूमी अभिलेख आणि इतर संबंधित विभागांमध्ये साधे सामंजस्य नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या गोंधळामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, हा प्रकल्प नक्की कोणासाठी? असा प्रश्न विचारला जात आहे.

    भूमी अभिलेख विभाग म्हणतोय मोजणी होणार नाही, तर इतर विभाग आम्हाला काहीच माहीत नाही असे सांगून हात झटकत आहेत. केंद्राचा एवढा मोठा प्रकल्प असताना विभागांमध्ये संयुक्त मोजणीबाबत ताळमेळ नसणे, हे प्रशासनाचे दिवाळखोरपण सिद्ध करत आहे. दिलेल्या वेळापत्रकानुसार अडावद परिसरात मोजणी होणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात जमिनीवर अधिकारी फिरकलेच नाहीत. प्रशासनाचे नियोजन फक्त कागदावरच मर्यादित आहे का?, मोजणीसाठी शेअर केलेल्या पीडीएफ यादीत आणि प्रत्यक्ष जागेवरील नावांमध्ये कोणताही ताळमेळ नाही. ज्या परिसरात मोजणी सुरू आहे, तिथे दुसऱ्याच गावच्या शेतकऱ्यांची नावे असल्याने हा सावळा गोंधळ नेमका कोणाच्या सोयीसाठी घातला जात आहे?

    शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पोस्टल नोटीस देण्याऐवजी फक्त व्हाट्सअप ग्रुपवर नोटीसा फिरवल्या जात आहेत. विशेष म्हणजे, या नोटीसाही वारंवार रद्द केल्या जात असल्याने शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत होत आहे. मोजणीचा पत्ता नाही, शेतकऱ्यांना नोटीस नाही, तरीही वर्तमानपत्रांतून पर्यायी वाहतूक वळवण्याच्या बातम्या येत आहेत. जमीन ताब्यात घेण्याआधीच रस्ते बंद करण्याची तयारी करणे, ही कसली घाई? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

    ही मोजणी केवळ भूमी अभिलेख मार्फत आहे की, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासोबत संयुक्तपणे आहे, हे समजायला कोणताही मार्ग उरलेला नाही. नियमानुसार मोजणीच्या वेळी सर्व विभागांचे अधिकारी आणि शेतकरी उपस्थित असणे अनिवार्य आहे, मात्र येथे कायद्याची पायमल्ली होताना दिसत आहे.

    प्रशासनाचा हा पोरखेळ आम्ही थांबवणार आहोत. व्हाट्सअपवर नोटीस पाठवून जमिनी बळकावता येणार नाहीत. जोपर्यंत प्रत्यक्ष लेखी नोटीस मिळत नाही आणि आमचा सातबारा स्पष्ट होत नाही, तोपर्यंत एक इंचही मोजणी होऊ देणार नाही.

    – सुरेश सोनवणे
    संतप्त शेतकरी, धानोरा

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात

    May 13, 2026

    गिरणा नदीपात्रात बैलगाडी उलटली; शेतकऱ्याचा बुडून अंत!

    May 12, 2026

    दारूच्या व्यसनापायी हसते खेळते घर उद्ध्वस्त

    May 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif