अखेर महाराष्ट्रात आजपासून कडक लॉकडाउन; पाहा, काय आहेत नवे नियम !

0

मुंबई : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने अखेर आज रात्री ८ वाजेपासून कडक लॉकडाऊनची घोषणा केलीय. त्यासाठी ब्रेक द चेनअंतर्गत राज्य सरकारने आज नवे नियम जाहीर केले आहेत. तसेच हे नियम न पाळल्यास दंड देखील ठोठावण्यात येणार आहे.

कार्यालयांमधील उपस्थितीबाबत नियम:

-राज्य सरकार, केंद्र सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयात केवळ १५ टक्के कर्मचाऱ्यांनाच उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे.

-इतर कार्यालायांना देखील एकूण कर्मचारी संख्येच्या १५ टक्के इतक्याच कर्माचाऱ्यांना परवानगी देण्यात आलेली आहे.

-अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांना कर्मचाऱ्यांना कमीत कमी काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय त्यांनी आपल्या रकर्मचाऱ्यांची संख्या ५० टक्क्यांहून अधिक असणार नाही याची काळजी घेणे अनिवार्य असेल.

-अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्याही मर्यादित असणे गरजेचे. मात्र डिलिव्हरी करण्याच्या कामासाठी कर्मचारी वर्ग गरजेपोटी १०० टक्के करता येऊ शकणार आहे.

लग्न समारंभासाठी नियम:

-लग्न समारंभात विविध कार्यक्रम न घेता एकच कार्यक्रम घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

– तसेच, हा कार्यक्रम केवळ २ तासात आटोपला पाहिजे

-लग्नसोहळ्याला एकूण २५ जणांनाच परवानगी असेल

– हा नियम मोडल्यास ५० हजार रुपये इतका दंड आकारण्यात येणार आहे.

-शिवाय, हे नियम मोडले गेल्यास ते ठिकाण, हॉल करोनाचा उद्रेक असेपर्यंत बंद करण्यात येणार आहे.

खाजगी प्रवासी वाहतुकीसाठी नियम:

-खाजगी बसेसना केवळ योग्य कारणासाठी ५० टक्के बसण्याच्या क्षमतेसह परवानगी देण्यात आलेली आहे.

– ही परवानगी एका शहरातून दुसऱ्या शहरात, किंवा एका जिल्हयातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी देण्यात आलेली नाही.

– आंतरशहर किंवा आंतरजिल्हा प्रवास हा केवळ अत्यावश्यक सेवा आणि वैद्यकीय आणीबाणी, कुटुंबातील व्यक्तीचे अंत्यसंस्कार किंवा गंभीर स्वरूपाच्या आजारी व्यक्तीला भेटण्यासाठी करता येणार आहे.

-खाजगी प्रवासी वाहतूक केवळ ५० टक्के बसण्याच्या क्षमतेनेच करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

-अशा बसेसना शहरात केवळ २ थांबे घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच ही माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

-असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या हातावर शिक्का मारण्यात येणार असून त्याला १४ दिवस होम क्वारंटाइन राहणे बंधनकारक असेल.

-अशा प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात येईल. ज्या प्रवाशांना लक्षणे आढळल्यास त्यास कोविड सेंटरमध्ये पाठवण्यात येईल.

-प्रवासी जेथे उतरेल त्या ठिकाणी जिल्हाधिकारी रॅपिड अँटिजेन चाचणी करू शकतात.

-कोणत्याही प्रवाशाने नियमाचा भंग केल्यास त्यास १० हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे.

सार्वजनिक प्रवासी वाहतुकीसाठी नियम:

– फक्त खालील प्रकारामधील लोकांनाच लोकल ट्रेन, मेट्रो आणि मोनोरेलद्वारे प्रवास करता येणार आहे.

-सर्व शासकीय कर्मचारी (राज्य, केंद्र आणि स्थानिक स्वराज्य संस्था)

-सर्व वैद्यकीय कर्मचारी (डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, लॅब तंत्रज्ञ, हॉस्पिटल आणि मेडिकल क्लिनिक स्टाफ)

-राज्य सरकारच्या किंवा स्थानिक प्रशासनाच्या बसेसमध्ये केवळ ५० टक्के प्रवाशांना प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे. यात उभ्याने प्रवास करता येणार नाही.

-दुसऱ्या शहरात किंवा दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करणाऱ्या लांब पल्ल्याच्या ट्रेन किंवा बसेससाठी नियम खालील प्रमाणे:

-स्थानिक रेल्वे अधिकारी/ एमएसआरटीसी अधिकारी यांनी प्रवासाबाबतची माहिती स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना कळवणे बंधनकारक आहे.

-सर्व प्रवाशांना १४ दिवस होम क्वारंटाईन राहणे बंधनकारक असेल. सर्व प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंग होईल. लक्षणे आढळल्यास कोविड सेंटरला पाठवण्यात येईल.

-प्रवासी उतरेल त्या ठिकाणी रॅपिड अँटिजन चाचणी करण्याची निर्णय जिल्हाधिकारी घेतील.

Leave A Reply

Your email address will not be published.