उन्हाळ्यात जरूर खा ‘या’ ५ भाज्या व फळे, शरीरात अजिबात होणार नाही पाण्याची कमतरता

0

उन्हाळ्यात हंगामी फळे आणि भाज्यांचे सेवन करणे खूप महत्वाचे असते. हे केवळ उष्णतेपासूनच आराम देत नाही तर शरीरातील पाण्याची कमतरता दूर करण्यात देखील या भाज्या व फळे मदत करतात.

उन्हाळ्याचे दिवस सर्वांसाठीच खूप वेदनादायक असतात. या हंगामात आपल्याला काहीच खावेसे वाटत नसले तरी तहान मात्र खूप जास्त लागते. कारण उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते आणि अशा परिस्थितीत आपण योग्य प्रमाणात पाणी पिण्यात दुर्लक्ष केले तर डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते. या समस्येपासून बचाव करण्यासाठी आपण हंगामी फळे आणि भाज्या खाऊ शकतो. ही फळे व भाज्या खाल्ल्याने उष्णतेपासून आराम मिळेल तसेच शरीरात पाण्याची कमतरताही दूर होईल.

या हंगामात येणारी सर्व फळे आणि भाज्या पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात. ही केवळ आपली तहानच भागवत नाहीत तर आपल्याला ताजेतवाणे देखील ठेवतात. म्हणूनच उन्हाळ्याच्या दिवसांत आपल्या आहारात काही बदल करून या हंगामी पदार्थांचा आहारात जरूर समावेश करावा. यामुळे तुम्ही रणरणत्या उन्हात देखील हायड्रेटेड आणि ऊर्जावान राहू शकाल. चला तर या लेखात जाणून घेऊया अशा सहा हंगामी फळ आणि भाज्यांबद्दल जी आपल्याला कोणताही महागडा उपाय न करता हायड्रेटेड ठेवतात.

कलिंगड
उन्हाळ्याच्या दिवसांत थंड आणि गोड गोड कलिंगड खाण्यापेक्षा चांगलं काही असूच शकत नाही. या उष्णतेच्या काळात कलिंगड शरीरात पाण्याच्या कमतरतेची पूर्तता करते. ९२ टक्के पाणी असल्याने हे फळ सर्वात चांगल्या हायड्रेटिंग पदार्थांपैकी एक मानले जाते. इतकेच नाही तर यामध्ये फायबर, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ए, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडेंट लाइकोपीन देखील भरपूर प्रमाणात आहेत, जे कर्करोग किंवा हिट स्ट्रोकमध्ये खाल्ल्याने मोठ्या प्रमाणात फायदा होतो. विशेषत: उन्हाळ्यात रिफ्रेश होण्यासाठी एक प्लेट कलिंगड नियमित खा पण ते खाल्ल्यानंतर पाणी पिणं कटाक्षाने टाळा.

Leave A Reply

Your email address will not be published.