जळगाव प्रतिनिधी । कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या जळगाव जिल्ह्यात अचानक रुग्णसंख्येत वाढ झाल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. काल रविवारी जिल्ह्यात ४०० रुग्ण आढळून आल्यानंतर आज पुन्हा रूग्णसंख्या चारशेच्या उंबरठ्यावर आढळून आली आहे. आज दिवसभरात ३९६ कोरोना बाधीत आढळून आले आहेत. तर १२० रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जळगाव शहरासह चोपडा, चाळीसगाव व भुसावळ तालुक्यातील संसर्ग वाढीस लागल्याचे यातून दिसून आले आहे.
असे आढळले रुग्ण
जळगाव शहर-१४५, जळगाव ग्रामीण-३, भुसावळ-३६, अमळनेर-१२, चोपडा-64, पाचोरा-१, भडगाव-५, धरणगाव-२, यावल-१, एरंडोल-१, जामनेर-२, रावेर-५, पारोळा-१५, चाळीसगाव-६९, मुक्ताईनगर-१७, बोदवड-१२ आणि इतर जिल्हे ६ असे एकुण ३९६ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात आजपर्यंत एकुण ६१ हजार २७४ रूग्ण कोरोना बाधित आढळून आले आहे. त्यापैकी ५७ हजार १०८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ७७९ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज चाळीसगाव तालुक्यातील ५३ वर्षीय आणि जळगाव शहरातील ४५ वर्षीय बाधित रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.