आजाराला कंटाळून पहूर येथील विवाहितेची आत्महत्या

0

पहूर ता जामनेर (वार्ताहर)  येथील संतोषी माता नगर येथील ३० वर्षीय विवाहितेने आजाराला कंटाळून  गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि संतोषी माता नगर येथील रहिवासी योगेश गायकवाड हे पत्नी अर्चना गायकवाड हे आपल्या दोन मुलांसह राहतात. योगेश गायकवाड हे महावितरण कंपनी मध्ये नोकरीला असून ते रात्रपाळीसाठी डिवटीवर गेले होते. घरी अर्चना दोघ मुलांसह एकटी घरी होती. आज सकाळी सात वाजेच्या सुमारास अर्चना चा भाऊ नवल पाटील हा बहिन अर्चना हिस उपचारासाठी दवाखान्यात न्यायचे आहे म्हणून निरोप देण्यासाठी आला होता. त्यावेळी अर्चना चे दोघ मुल खेळत होते. नवल पाटील

घरात आल्यावर त्यांनी मुलांना आईबाबत विचार पुस केली असता.आई आंघोळ करीत असल्याचे सांगितले. नवल पाटील हे बहिनीची वाट पाहत घरात बसून राहिले,  बराच वेळ झाल्यावरही बहिन अर्चना ही बाहेर न आल्याने नवल पाटील यांनी भाची तनू हिस मम्मी ला बघून ये असे सांगितले. यावरून तनू ही बाथरूम मध्ये तिच्या आईला पाहण्यासाठी गेली असता तनूने ते दृश्य पाहून हंबरडाच फोडला . कारण अर्चना ही बाथरूम मध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. नवल पाटील यांनी घटनेची माहिती पोलीसांना दिली.घटनास्थळी पहूर पोलीसांनी पंचनामा करून पोलीसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जामनेर उपजिल्हा  रूग्णालयात नेण्यात आले. जामनेर पोलीस स्टेशनला  शून्य क्रमांकाने  अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पहूर येथे शोकाकुल वातावरणात अर्चना चे  अंत्यसंस्कार करण्यात आले.

अर्चना गायकवाड ही खर्चाने येथील प्रगतीशील शेतकरी सुपडू पाटील यांची मुलगी तर पहूर येथील शितल डेअरीचे संचालक अर्जुन पाटील यांची पुतनी आहे. अर्चना च्या पश्यात पती, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.