क्या लोग भाभीजी के पापड खा करके ठीक हो गये? खा. संजय राऊत

0

नवी दिल्ली : देशातील करोनाचा प्रसार अजूनही थांबलेला नाही. दिवसेंदिवस स्थिती गंभीर होत असून, दिवसाला एक लाखांच्या जवळपास रुग्ण आढळून येत आहेत. देशातील करोना परिस्थितीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी संसदेत सविस्तर निवेदन सादर केले. आरोग्य मंत्र्यांच्या निवेदनावर बोलताना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला सवाल केले. “हा राजकीय लढा नाहीये, लोकांचा जीव वाचवण्यासाठी लढाई आहे,” अशी टीकाही राऊत यांनी केली.

संसदेत बोलताना संजय राऊत म्हणाले,”माझ्या आई आणि भावालाही करोनाचा संसर्ग झाला होता. महाराष्ट्रात अनेक लोक करोनातून बरे होत आहेत. आज धारावीतील परिस्थिती नियंत्रणात आहे. बृह्नमुंबई महापालिकेनं केलेल्या कामाचं जागतिक आरोग्य संघटनेनं कौतुक केलं आहे. काल काही सदस्यांनी महाराष्ट्रावर टीका केली, त्यामुळे मी हे सत्य सांगतोयरोनसे झाले? क्या लोग भाभीजी के पापड खा करके ठीक हो गये? ही राजकीय लढाई नाह ीये, तर लोकांचे जीव वाचवण्याची लढाई आहे,” अशा शब्दात राऊत यांनी टीकाकारांना उत्तर दिलं.

Leave A Reply

Your email address will not be published.