चाळीसगाव तालुक्यातील ११ गावांमध्ये ५३ कोटी लिटर पाणीसाठ्यातून जलक्रांती

0

१ हजार ६९२ तास चाललेल्या मशिनीतून झाले ५ लाख ३३ घनमीटर नालाखोलीकरण

चाळीसगाव – गाव करी ते राव काय करी अशी प्रसिद्ध म्हण आहे. गावाने ठरवलं तर अशक्य अशी गोष्ट शक्य होऊ शकते मात्र यासाठी आवश्यक असतो लोकसहभाग व या लोकसहभागाला जोड मिळाली चाळीसगाव तालुक्यात सुरु झालेल्या शिवनेरी फाउंडेशन संचलित भूजल अभियानांतर्गत मिशन ५०० कोटी लिटर जलसाठा या अभियानाची. चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण, आयकर उपायुक्त उज्वलकुमार चव्हाण व पुणे स्थित मूळ कळमडू गावाचे सुपुत्र सॉफ्टवेअर इंजिनिअर गुणवंत सोनवणे यांनी एकत्र येत चाळीसगाव तालुक्यातील दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी एक जलचळवळ उभारण्याचा निर्णय घेतला. त्यात प्रशिक्षण, जनजागृती व लोकसहभागातून नदी – नाल्यांचे खोलीकरण करून ५०० कोटी लिटर जलसाठा निर्माण करण्यासाठी तालुकास्तरीय स्पर्धा घेण्याचा संकल्प करण्यात आला. आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी सौ.प्रतिभा चव्हाण अध्यक्ष असलेल्या शिवनेरी फाउंडेशनने यात सक्रियपणे सहभाग घेतला व या अभियानाला शिवनेरी फाउंडेशन संचलित भूजल अभियान मिशन ५०० कोटी लिटर जलसाठा निर्माण स्पर्धा – २०२० असे नाव देण्यात आल. याअंतर्गत यावर्षी ब्राम्हणशेवगे / नाईकनगर, पिंप्री बु.प्रदे, खडकीसीम, चैतन्यनगर, कढरे, जामदा, इच्छापूर, पोहरे, चिंचगव्हाण, सुंदरनगर व कळमडू  आदी गावांमध्ये शोषखड्डे, जलसंधारण व नदी – नाला खोलीकरण अशी कामे करण्यात आली. या निर्माण झालेल्या जलसाठ्याचे जलपूजन आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते ब्राम्हणशेवगे, जामदा व चैतन्यतांडा येथे करण्यात आले. यावेळी अभियानाचे मार्गदर्शक गुणवंत सोनवणे, पंचायत समितीचे गटनेते संजय भास्करराव पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सरदारसिंग राजपूत, पंचायत समिती सदस्य पियुष साळुंखे, चैतन्यनगरचे सरपंच दिनकर राठोड, जामद्याचे सरपंच गोकुळ पाटील, इच्छापूर चे सरपंच निलेश राठोड, पाच पाटील नगरसेविका श्रीमती सविताताई राजपूत, दयाराम सोनवणे, सोमनाथ माळी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सुनील पवार, आबा पाटील, राहुल पाटील, बाबासाहेब नेरकर, निलेश चिंचोले, पुजारी बाबा, ग्रामसेवक चव्हाण भाऊसाहेब, आनंदा जाधव, राहुल राठोड आदी उपस्थित होते.

आमदार मंगेश चव्हाण यांच्या शिवनेरी फाऊंडेशन च्या माध्यमातून पाणी फाऊंडेशन पुरस्कार प्राप्त आभोणे तांडा ता.चाळीसगाव येथे सहभागी ५० गावांना शास्रोक्त पद्तीने प्रशिक्षण देण्यासाठी निवासी ट्रेनिंग सेंटर उभारण्यात आले होते. या ट्रेनिंग सेंटर साठी नामांकित प्रशिक्षक, प्रशिक्षित टीम नियुक्त केली गेली. एका बॅचसाठी २ दिवस एक रात्र अश्या स्वरुपात झालेल्या प्रशिक्षणात माथा ते पायथा संरचना, शोषखड्डे याचं महत्व आदींबाबत प्रशिक्षण देण्यात आले.

तसेच तालुक्यातील ११ गावांना सेवा सहयोग संस्थेच्या माध्यमातून Vanderlande व मीडिया ओशन या कंपनी तर्फे जल संधरणाच्या कामासाठी जेसीबी मशीनीची मदत केली. मशीन उपलब्ध झाल्याने ज्या नदी – नाल्यालगत जे शेतकरी आहेत त्यांनी वर्गणी करून जेसीबी मध्ये डीझेल टाकून काम पूर्ण केले.

यामाध्यमातून चाळीसगाव तालुक्यात एकूण काम 5 लाख, 33 हजार,728 घ.मीटर झाले आहे. तसेच त्यामुळ एका पावसाचा होणारा जलसाठा हा 53 कोटी, 37 लक्ष, 28 हजार, 222 लिटर इतका प्रचंड प्रमाणात झालेला आहे. जर आपण १० पावसांचा विचार केला तर तो जलसाठा 533 कोटी 72 लक्ष 80 हजार लिटर इतका महाप्रचंड प्रमाणामध्ये झाला आहे. जर हा पाणीसाठा 10 हजार लिटर पाण्याच्या टँकर मध्ये मोजला तर ते 5 लक्ष 33 हजार 728 टँकर इतके भरेल. त्याच पाण्याची बाजारभाव प्रमाणे किंमत जर विचारात घेतली तर ते 266 कोटी, 86 लक्ष, 40 हजार, रु किंमतीचे असेल. तालुक्यात मशीन हे तब्बल 1 हजार, 692 तास चालले व शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचे डीझेल टाकले गेले व करोडो लीटर पाणीसाठा निर्माण करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.