ठिबकची नळी निंबाच्या झाडाला बाधून गाढोद्यातील शेतकऱ्याची आत्महत्या

0

जळगाव (प्रतिनीधी) : तालुक्यातील गाढोदा येथील तरुण शेतकऱ्याने घरगुती वादातून गावात असलेल्या आपल्या शेतात ठिबकच्या नळीने झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी 11 वाजता घडली. प्रकाश मानसिंग पाटील (वय 31) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान, रक्षाबंधन सणाच्या दिवशीच्या या घटनेने ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक असे की, प्रकाश पाटील हे गाढोदा येथे आपल्या कुटुंबियांसमवेत राहत होते. घरापासून 500 मीटरच्याय अंतरावरच त्यांचे शेत आहे. सोमवारी प्रकाश पाटील यांचे घरात वाद झाले. या वादानंतर प्रकाश पाटील यांनी त्यांचे शेत गाठले. याठिकाणी त्यांनी शेतातील ठिबकच्या नळी निंबाच्या झाडाला बांधत गळफास घेतला. रस्त्यालगत शेत असल्याने ग्रामस्थांच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी पोलीस पाटील भगवान मधुकर पाटील यांना माहिती दिली. त्यानुसार भगवान पाटील यांनी घटनास्थळ गाठले. तसेच तालुका पोलिसांना प्रकाराची माहिती देत प्रकाश पाटील यांना तत्काळ खाजगी वाहनातून जिल्हा रुग्णालयात हलविले. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. निता भोळे यांनी मृत घोषित केले. याप्रकरणी डॉ. निता भोळे यांच्या खबरीवरुन तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अरुण राठोड करीत आहेत.

प्रकाश पाटील यांच्या पश्‍चात पत्नी सुनंदाबाई, मुले भरत आणि संदीप, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.