भुसावळ (प्रतिनिधी )- रिक्षा चालकांवर उपवासमारीची वेळ आल्याने भुसावळ येथील रिक्षा चालक व मालक यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र काँग्रेस असंघटित कामगार संघटना जळगांव जिल्हातर्फे जिल्हाध्यक्ष गणेशभैय्या बारसे यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे कार्यक्रमाचे समन्वयक योगेंद्रसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा काँग्रेस अनु जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भुसावळ प्रांत अधिकारी रामसिंग सुलाने यांना गुरुवार ३० रोजी निवेदन देण्यात आले.
यात गेल्या सहा महिन्यांपासून कोरोना महामारीमुळे रिक्षा चालक व मालक यांचा व्यवसाय ठप्प झाल्याने त्यांचेवर उपासमारीची वेळ आलेली आहे.त्यामुळे शासनाकडे त्यांच्या काही मागण्या काँग्रेस असंघटित कामगार संघटनेमार्फत मांडण्यात आल्या. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे कार्यक्रमाचे समन्वयक मा.योगेंद्रसिंग पाटील, जिल्हा काँग्रेस अनु जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे,असंघटित कामगार संघटना जळगांव जिल्हाध्यक्ष मा.गणेशभैय्या बारसे,व रिक्षा चालक व मालक मोठ्या संख्येत उपस्थित होते.