पाळधी (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून पाळधी गावात चोर धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे पाळधी गावातील नागरिक भयभीत व त्रस्त झाले आहेत. काही दिवसांपूर्वी महामार्ग क्र, 6 वरून ट्रॅक्टर ट्रॉली चोरी झाले होते तसेच काही शेतकऱ्यांचे ठिबक व भाकऱ्या सुद्धा चोरीस गेले आहेत. ऊभ्या गाड्यांचे टायर रात्री चोरीस गेले असून अद्यापही या चोरांचा व चोरीचा गेलेले साहित्याचा शोध लागलेला नाही. आत्ताच अनेक दिवसापासून बंद असलेले उपहारगृह (होटेल कर्मा) हे गेल्या अनेक दिवसापासून बंद आहे तेथे काहीच चोरीचा प्रयत्न झाला त्यावेळी जवळच असलेल्या काही नागरिकांना याबाबत समजले त्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली आणि चोरीच्या प्रयत्न हाणून पाडला यावेळी पोलिसांना पाचारण करण्यात आले. चोर आपले वाहन (क्रमांक एम एच 03-3311)
टाटा एस छोटा हत्ती यातून पळाले व दुसरे वाहन (क्रमांक एम एच 19 व्हि 51 53) रिक्षा ही जप्त करण्यात आली आहे.
या वाहनांचा मालकाच्या शोध अद्यापही लागलेला नाही ऊपहार गृहाची चोरीची तक्रार कोणी केली नाही ,पोलीस प्रशासन तक्रारीची वाट बघत आहे का ,असा प्रश्न पाळधी येथील नागरिक करत आहेत, या चोरांची साखळी आहे अशिही गावात चर्चा सुरू आहे नागरिकांनी पाळधी पोलीस चौकी येथे सह पोलीस निरीक्षक हनुमंतराव गायकवाड यांना निवेदन देऊन चोरीचा तपास लावण्याची मागणी केली ,यावेळी उपस्थित नितीन कापुरे राहुल धनगर दगुबाई कोळी बेबा धनगर सोपान धनगर विजय कोळी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.