वरणगाव : येथील अग्नीशमन दलाच्या रावजीबुवापरिसरातील इमारतीतून पावणे दोन लाखाच्या साहित्याची चोरी झाली होती. त्यात आता एकूण नऊ आरोपींना अटक झालेली आहे .
नगर परिषदेच्या अग्नीशमन दलाच्या नव्या इमारतीचे २५ दरवाजे व दोन इलेक्ट्रीक पंपाची चोरीच्या घटनेला आठ दिवस झाले .व आतापर्यंत गावातील च नऊ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे .पंरतु आजपर्यंत फक्त 44350/रु . किमतीचा माल हस्तगत करण्यात आला असून . उर्वरीत जवळ -जवळ एक लाख तीस हजार रू . चा माल हस्तगत करणेसाठी सर्व आरोपींना 29 जुलै पर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सह फौजदार सुनिल वाणी पो हे कॉ गणेश शेळके हे करीत आहे.