पाळधी, ता.धरणगाव – सद्या देशात व महाराष्ट्र मध्ये लॉकडाऊन असल्याने महाराष्ट्रतील व बाहेरून आलेल्या महाराष्ट्र मध्ये असणाऱ्या पायदळी जाणाऱ्या लोकांसाठी रोज पाळधी येथे ४० किलो तांदुळाची खिचडी बनवून वाटप सुरू आहे. हा उपक्रम ना. गुलाबराव पाटील फौंडेशन यांच्या मार्फत करण्यात येत आहे.
या उपक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, बालाजी किराणा पाळधी सुनील भाऊ, पप्पू तिवारी , गोपी पाटील, शरद माळी, आबा माळी, मच्छिद्र कोळी, भैय्या कोळी, राजू वामन पाटील, राजू झावरू पाटील, मुन्ना थोरात, यशवंत पाटील, जितेंद्र चौधरी, दिलीप थोरात, भिकन राजपूत, फुलपाट यांनी सहकार्य केले.