भडगाव प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून भडगावात बंदमुळे मोल मजुरी करुन रोजच्या दोनवेळेच्या जेवणाची व्यवस्था करणाऱ्यांना आता उपासमारीची वेळ आलेली आहे. याची दखल घेत शहरातील व्यापारी, उद्योजक वर्गातर्फे शनिवारपासून शहरातील वडरवाडा , शांतीनगर , गिरणा नदी पात्रातील रहिवांश्यासह विविध भागांत भोजनाचे पॅकेट वितरीत करण्यात आले. रोज सकाळी पुरी, भाजी व संध्याकाळी खिचडी पोट भरण्यासाठी दिले जाणार आहे . शहरातील सर्व सामाजिक संस्था व नागरीकांनी गरजुपर्यंत भोजन पोहचवण्यासाठी सहकार्य कराण्याचे आवाहन करण्यात आले आहे .तहशिलदार माधुरी आंधळे , पोलीस निरिक्षक धनंजय येरुळे , मुख्याधीकारी विकास नवाळे यांचे सहकार्य लाभत असून याप्रसंगी उद्योजक समीर जैन , जैन संघाचे अध्यक्ष मदनलाल जैन , माजी उपनगराध्यक्ष आनंद जैन , सुभाष राका , मेडीकल असोशिएशनचे अध्यक्ष सुरेश भंडारी, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष सुयोग जैन , शैलेश तोतला , पंकज झवर , विजय पारख , प्रतीक जैन , वरुण जैन , आदेश जैन , मनोज छाजेड यांची उपस्थिती होती.