टँकरने रिक्षाला चिरडले ; ९ जणांचा मृत्‍यू

0

औरंगाबाद : भरधाव वेगाने जाणाऱ्या टँकरने समोरून येणाऱ्या अॅपे रिक्षाला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात अ‍ॅपे रिक्षातील ९ प्रवासी ठार झाले. हा अपघात शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पैठण रोडजवळच्या नक्षत्रवाडी जवळ घडला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या चार जणांना उपचारासाठी घाटी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शहराजवळील गेवराई तांड्याजवळ संध्याकाळी सहाच्या सुमारास एका पाण्याच्या टँकरचे ब्रेक निकामी झाल्याने अनियंत्रित झाले. यातच समोरून येणाऱ्या एका अपे रिक्षाला चिरडत ते पुढे गेले. अपे रिक्षावर टँकर चढल्याने त्यातील प्रवासी दबले गेले. नागरिकांनी बचाव कार्य करत जखमींना बाहेर काढले. जखमींना तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथेच उपचारा दरम्यान ९ जणांचा मृत्यू झाला. तर इतर दोघे गंभीर जखमी आहेत त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.