जामनेरचा रुपेश बि-हाडे राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत राज्यात दुसरा

0

जामनेर : – येथील रहिवाशी रुपेश राजाराम बि-हाडे यांने इंटोलेकच्युल फोरम पुणे आणि किसान पुत्र आंदोलनाच्या संयुक्त विद्यामानाने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार पटकाविला आहे.माजी खा.प्रदिप रावत, किसानपुत्र आंदोलन अमर हबीब, मुक्त पत्रकार आयुषी महागावकर, सतिष देशमुख यांच्या हस्ते रुपेशला प्रमाणपत्र,पुस्तक व ३ हजार रुपये देऊन गौरविण्यात आले.शेतकरी आत्महत्याची कारणे व उपाययोजना स्पर्धेचा विषय होता.४८५ निबंध प्राप्त झाले होते.रूपेश याने यापूर्वीही निबंध लेखनामध्ये मुंबई, नाशिक,पुणे,कोल्हापूर डोबंविली, धुळे,जळगाव आपली चमक दाखविली असुन विविध पारितोषिक पटकाविली आहेत.

त्याच्या या यशाबद्दल नगरसेवक अतिष झाल्टे,प्रा.सुजित वाळके, प्रा.वाल्मिक बिलसोरे (संचालक पुर्णांक स्पर्धा परिक्षा जळगाव) प्रा.डॉ.शिरीष पाटील,प्रा.भालचंद्र पाटील,प्रा.डॉ.अनंशुमन मिश्रा, प्रा.संदिप बोरसे,प्रा.मिलिंद लोखंडे,सुरेश धनगर (ग्रा.पं. सदस्य ऊमाळे) संदिप पांचगे, संतोष सराफ,अण्णा सुरवाडे, संदिप राठोड,शशिकांत झाल्टे, गणेश माळी,विजय सुर्यवंशी,यांनी रुपेशचे अभिनंदन केले.त्याच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.