45 यात्रेकरुंना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात

0

अलीगढ – उत्तर प्रदेशातील अलिगढ परिक्षेत्रात बस पलटी झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी आहेत. जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. या बसमधून एकूण 45 प्रवाशी प्रवास करत होते. अलीगढच्या टप्पल परिसरात या बसला अपघात झाला.

 

कानपूरहून दिल्लीला जाणारी ही बस टप्पल परिसरात येताच रस्ता भरकटल्याने खाली कोसळली. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन आणि गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच, बसमधील जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, मृतांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. या दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबत, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच, अपघातातील जखमींना तत्काळ आणि योग्य उपचारसुविधा देण्याचे निर्देशही जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.