Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ओझरखेडा तलावामध्ये हतनूर धरणाचे पाणी!
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»मुंबईत एकाच दिवसात कोसळली 350 झाडं!
    महाराष्ट्र

    मुंबईत एकाच दिवसात कोसळली 350 झाडं!

    मुख्यमंत्र्यांनी दिली धक्कादायक आकडेवारी
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 6, 2026No Comments104 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    मुंबईसह महाराष्ट्रात पावसामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्या संदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात बोलले. मुंबईत काल अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. मानखुर्द भागात एक इमारत कोसळली. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर पाणी आल्यामुळे हा महामार्ग बंद आहे. मुंबई-पुणे रेल्वे मार्गही ठप्प आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यात घडलेल्या या सगळ्या घटनांचा आपल्या भाषणातून आढावा घेतला. त्यात मुंबईत झाड उन्मळून पडण्याच्या घटनांबद्दल महत्वाची माहिती दिली. “मुंबईत दरवर्षी मान्सूनच्या पावसात सरासरी 800 झाडं कोसळतात. पण काल एकाच दिवसात 350 झाडं पडली” अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

    “एक अतिशय अनपेक्षित परिस्थिती निसर्गाच्या माध्यमातून तयार झाली आहे. सभागृहात काही गोष्टी विरोधी पक्षाने उपस्थित केल्या. त्याचं गांभीर्य आहेच. मात्र या संदर्भात आपण लक्षात घेतलं पाहिजे. काल साधारणपणे ताशी 50 किमी वेगाने वारे वाहत होते. आजचा दिवस त्याही पेक्षा गंभीर आहे म्हणून आज म्हणून वर्क फ्रॉम होमची विनती आहे. आज दुपारनंतर 70 ते 90 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहणार आहे” असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

    मुंबईत झांड कोसळण्याच्या घटनांमध्ये काही जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मुंबईत यंदाच्या पावसाळ्यात झाडं कोसळण्याचं प्रमाणे वाढलं आहे. चेंबूरमध्ये विद्यार्थ्यांच्या बसवर झाडं कोसळलं होतं. यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. 10 विद्यार्थी जखमी झाले होते. काल दादर माटुंगा परिसरातही मोठ्या प्रमाणात झाडं उन्मळून पडली. माटुंगा मनीज समोर एक झाडं कोसळलं. त्या खाली काही गाड्या आल्या. कुर्ला नौपाडा येथे झाड कोसळलं. झाड कोसळून वृद्धाचा मृत्यू झाला.

    मुंबईत वांद्रे, कुर्ला, अंधेरी परिसरात अनेक ठिकाणी झाडं कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. काल ताशी 50 किमी वेगाने वारे वाहत होते तेव्हा अशी स्थिती होती. आज तर वाऱ्याचा वेग ताशी 70 ते 80 किमी असेल. त्यामुळे आजही अशा प्रकारच्या घटना घडण्याची भिती आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक

    August 11, 2026

    मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय

    August 11, 2026

    वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा

    August 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif